Headlines

कोलंबो टेस्टच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाचे हे ५ खेळाडू ठरवणार सामन्याचा निकाल; एकाकडे कमबॅकची संधी


India vs Sri Lanka Colombo Test : कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे. अखेरच्या दिवशी श्रीलंकेला लवकर ऑलआउट करण्यापासून ते छोट्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यापर्यंत या ५ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

india vs sri lanka second test colombo day5 saransh jain manav suthar kl rahul yashasvi jaiswal shubman gill
कोलंबो टेस्टच्या शेवटच्या दिवशी ‘या’ ५ खेळाडूंवर टीम इंडियाची मदार; एकाकडे कमबॅकची संधी
India vs Sri Lanka Test News : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस अत्यंत थरारक वळणावर येऊन ठेपला आहे. गॉल कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता कोलंबो कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Points Table) गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. सामना ‘ड्रॉ’ झाल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे विजयासाठी शेवटच्या दिवशी टीम इंडियाच्या या ५ प्रमुख शिलेदारांवर सर्वात मोठी मदार असणार आहे.

सारांश जैन

सारांश जैन

युवा ऑफ-स्पिनर सारांश जैनने चौथ्या दिवशी आपल्या फिरकीची कमाल दाखवत ३ महत्त्वाचे बळी घेतले आहेत. विशेषतः डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध तो अत्यंत घातक आणि प्रभावी ठरला आहे. पाचव्या दिवशीही त्याच्याकडून याच भेदक माऱ्याची अपेक्षा असेल. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या आणि खेळपट्टीवर तग धरून बसलेल्या सोनल दिनुशाला लवकरात लवकर तंबूत पाठवण्याची सर्वात मोठी जबाबदारी सारांशवरच असणार आहे.

मानव सुथार

मानव सुथार

कोलंबो कसोटीच्या शेवटच्या दिवशी स्टार फिरकीपटू मानव सुथारची भूमिकाही ‘गेम चेंजर’ ठरू शकते. टीम इंडियाचा प्रयत्न असेल की श्रीलंकेच्या उर्वरित फलंदाजांना ५० धावांच्या आत गुंडाळावे, जेणेकरून भारतासमोर ६० ते ७० धावांचे सोपे लक्ष्य राहील. यासाठी मानव सुथारला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून श्रीलंकेला लागोपाठ धक्के द्यावे लागतील.

केएल राहुल

केएल राहुल

सलामीवीर केएल राहुलने या दौऱ्यावर आतापर्यंत अत्यंत संयमी आणि आश्वासक कामगिरी केली आहे. पाचव्या दिवशीही त्याला आपला हाच फॉर्म कायम ठेवावा लागेल. जर भारतासमोर १०० धावांच्या आसपासचे लक्ष्य असेल, तर राहुलची जबाबदारी आणखी वाढेल. त्याने एका बाजूने खेळपट्टीवर भक्कम पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे, जेणेकरून धावांचा पाठलाग करताना संघावर कोणतेही दडपण येणार नाही.

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वाल

आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वालसाठी हा श्रीलंका दौरा आतापर्यंत अत्यंत खराब राहिला आहे. त्यामुळे या शेवटच्या डावात स्वतःला सिद्ध करण्याची आणि ‘कमबॅक’ करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. कोलंबोमध्ये पावसाचे मोठे सावट असल्याने सामना कधीही थांबू शकतो. अशा परिस्थितीत यशस्वीला आपल्या आक्रमक शैलीचा वापर करत पावसाचे आगमन होण्यापूर्वीच सामना खिशात घालण्याचा प्रयत्न करावा लागेल.

शुभमन गिल

शुभमन गिल

कर्णधार शुभमन गिलची पाचव्या दिवशी खऱ्या अर्थाने दुहेरी कसोटी लागणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना श्रीलंकेचे शेपूट गुंडाळण्यासाठी त्याला गोलंदाजीत अत्यंत अचूक आणि हुशारीने बदल करावे लागतील. त्यानंतर फलंदाजीची वेळ आल्यास, फिरकीला अनुकूल असलेल्या या कठीण खेळपट्टीवर जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजयाच्या पार नेण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. एक फलंदाज म्हणून ही मालिका त्याच्यासाठी संमिश्र राहिली आहे, त्यामुळे आज कॅप्टनवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा