मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत जात आहे. यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी तब्बल ४७७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सात दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरसह अन्य तीन जिल्ह्यांतील मिळून एकूण ५१ गावे आणि ४८ वाड्यांना ११४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर आता तहानलेल्या गावांच्या संख्येसह टँकरच्या संख्येतही वाढ झाली आहे. आजघडीला चार जिल्ह्यांतील तहानलेली १०५ गावे आणि ५५ वाड्यांना १८१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय मराठवाड्यात ४७७ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालया प्रशासनातर्फे देण्यात आली. तर उर्वरित चारही जिल्हे टँकरमुक्त आहेत.
पावसाच्या मोसमातही टँकरने पाणी पुरवठा
उन्हाळा सुरू होताच यंदाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावात टप्प्याटप्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला.
आतापर्यंत किती टँकरचा पुरवठा सुरु?
जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त नव्हता. विशेष म्हणजे जून अखेर छत्रपती संभाजीनगरातील टँकर बंद करण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी मागणी केल्याने टँकर पुन्हा सुरू करावे लागले. १४ जुलैदरम्यान विभागातील तहानलेल्या गावांना ३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता.
जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती. परंतु जुलै महिन्यात काही प्रमाणात दिलासा देणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत केवळ प्रतीक्षाच करायला लावली. परिणामी, पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होत गेल्याचे चित्र आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पाणी पुरवठा?
१८ ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील एकूण ५१ गावे, ४८ वाड्यांना मिळून ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर आजघडीला तहानलेल्या गावांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. सात दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ गावे आणि १० वाड्यांना २५ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. सध्या ६२ गावे आणि १७ वाड्यांना ९० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर जालन्यातील १६ गावे, १३ वाड्यांना २८ टँकरने, बीडमधील २० गावे, २५ वाड्यांना ५४ टँकरने तर धाराशिव जिल्ह्यातील सात गावांना नऊ टँकरद्वारे अशा प्रकारे एकूण १०५ गावे, ५५ वाड्यांना मिळून १८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली.
४७७ विहिरींचे अधिग्रहण
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित पाच जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २४ ऑगस्टच्या अहवालानुसार, एकूण ४७७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१, जालना ३०, बीड १५, लातूर २१७, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा