Rajiv Kapoor : राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांना प्रोफेशनल आयुष्यातसुद्धा संघर्ष करावा लागला. तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी त्रास सहन केला.

राजीव कपूर यांनी १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर वडील राज कपूर यांनी त्यांना आपल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मोठी संधी दिली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट यशस्वी झाला. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये राजीव कपूर मुख्य भूमिकेत होते, तर या सिनेमात मंदाकिनी यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा सिनेमा त्या काळातील मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला. मात्र, या यशाचं श्रेय मंदाकिनी यांच्या भूमिकेला मिळालं. त्यामुळे राजीव कपूर नाराज झाले. आपली भूमिकेची आणि अभिनयाची दखल घेतली गेली नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि याच कारणावरून त्यांचे वडील राज कपूर यांच्याशी मतभेद झाले.
Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स
वडिलांवरच फोडलं अपयशाचं खापर?
राजीव कपूर यांना आपल्या अभिनय कारकिर्दीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ‘राम तेरी गंगा मैली’सारखा मोठा चित्रपट मिळूनही त्यांना अपेक्षित स्टारडम मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी ‘अंगारे’, ‘हम तो चले परदेस’, ‘लव्हर बॉय’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु त्यांच्या करिअरला वेग मिळाला नाही. राजीव आपल्या करिअरच्या अपयशासाठी वडिलांना जबाबदार मानत होते. ‘राम तेरी गंगा मैली’नंतर दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद पुढेही कायम राहिले. राज कपूर यांनी त्यानंतर राजीव यांना आपल्या एकाही चित्रपटात प्रमुख भूमिका दिली नाही. यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
Renuka Daftardar : ‘शास्त्र असतं ते…’ फेम रेणुका दफ्तरदार पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर, हास्यजत्रा फेम अभिनेताही सोबतीला, प्रेक्षक उत्सुक
१९८८ मध्ये राज कपूर यांचं निधन झालं. वडिलांशी असलेल्या नाराजीमुळे राजीव कपूर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नव्हते. अभिनयात अपेक्षित यश न मिळाल्यानंतर राजीव कपूर यांनी पुढे निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळण्याचा प्रयत्न केला. १९९६ मध्ये त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात त्यांचे भाऊ ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी सिनेमाची निर्मितीही केली.
अभिनेत्याला लागलं दारूचं व्यसन
राजीव कपूर यांना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यातच चढ-उतारांचाच सामना करावा लागला नाही, तर त्यांचे पत्नीसोबतचे संबंधही चांगले नव्हते होते. २००१ मध्ये, या अभिनेत्यानं आर्किटेक्ट आरती सभरवाल यांच्याशी लग्न केलं, परंतु २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर, त्यांनी पुण्यात एक बंगला विकत घेतला आणि एकटे राहू लागले. राजीव यांना दारूचं व्यसन लागलं आणि दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, नंतर ते त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांच्या चेंबूर येथील घरी राहायला गेले. एकाकीपणामुळे त्रस्त होऊन, ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं राजीव कपूर यांचं निधन झालं.

