Headlines

२०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार| Maharashtra Times


Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी हा प्रस्ताव मंजूर झाला तरी २०३० पर्यंत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा दहापदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC ) गेल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी सुधारित निधी योजना राज्य सरकारसोमर सादर केली आहे. जर या योजनेला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली तर प्रकल्पाला चालना मिळणार आहे.

‘मिसिंग लिंक’मुळे मोठा फायदा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे. दररोद मोठ्या संख्यने वाहनं महामार्गावरून प्रवास करतात. मे महिन्यात सुरु झालेल्या ‘मिसिंग लिंक’ मार्गामुळे वाहतूककोंडी कमी झाली आहे. सर्व प्रवासी वाहनांची वाहतूक या मार्गावर वळवळी गेली आहे. यामुळे हलक्या वाहनांसाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मार्ग खुला करण्यात आल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच हलक्या वाहनांची ७० टक्के वाहतूक मिसिंग लिंकवर वळली होती. पण अवजड वाहनांना सध्या मिसिंग लिंकवर सहा महिने बंदी आहे. त्यामुळे अवजड वाहनं अजूनही या सहापदरी मार्गावरून प्रवास करतात. तसेच, दरवर्षी माहमार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या वाहनांना हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार होणं गरजेचं आहे.

Maharashtra TimesAiroli-Katai Naka Project: ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला

या वर्षात जर राज्य सरकारकडून प्रस्ताव मंजूर झाला तर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) मॉडेल अंतर्गत निविदा काढली जाईल. त्यानंतर २०२७ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून २०३० पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. सुधारित प्रस्तावामध्ये प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेवर लक्ष देण्यात आलं आहे. विद्यमान वाहतुकीतून मिळणारा महसूल प्रकल्पाचं भांडवल आणि परिचलन खर्च भागवण्यासाठी पुरेसा असल्याचं MSRDCचं मत आहे.

२०२७ मध्ये काम सुरू होण्याची शक्यता

“आम्ही सुधारित प्रस्ताव सादर केला असून आता फक्त सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निश्चित सवलतीच्या कालावधीत वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलीच्या आधारे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचं मूल्यांकन केलं जात आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर BOT मॉडेल अंतर्गत कंत्राटदार नेमण्यात येईल. २०२७ मध्ये काम सुरू केल्यास हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी २०३० मध्ये वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, मुंबई आणि पुणे शहरांमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या कॉरिडोरचा विस्तार करणं महत्त्वाचं आहे. तसेच, दोन्ही भागांत सुरू होणाऱ्या नव्या विमानतळांना ध्यानात घेऊन हा महत्त्वाचा दुवा विकसित करण्यावर भर देणं महत्त्वाचं आहे,” असं मत MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Maharashtra TimesKonkan Railway: मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने

नवी मुंबईतील कळंबोलीपासून पुण्यातील किवळेपर्यंत २००२ मध्ये ९४.६ किमी लांब मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला होता. हामहामार्गा आठवड्याच्या दिवशी ६५,००० वाहनांची वाहतूक हाताळतो. वीकेंडला हीच संख्या एक लाखावर पोहोचते. तसेच, दरवर्षी वाहनांची संख्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. देशातील सर्वात व्यस्त द्रुतगती महामार्गांपैकी एक असलेल्या मार्गावर वाहतूक सुरू ठेवून विस्ताराचं काम करणं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतींनी बांधकाम करण्याची गरज असेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा