Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी हा प्रस्ताव मंजूर झाला तरी २०३० पर्यंत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे.

‘मिसिंग लिंक’मुळे मोठा फायदा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे. दररोद मोठ्या संख्यने वाहनं महामार्गावरून प्रवास करतात. मे महिन्यात सुरु झालेल्या ‘मिसिंग लिंक’ मार्गामुळे वाहतूककोंडी कमी झाली आहे. सर्व प्रवासी वाहनांची वाहतूक या मार्गावर वळवळी गेली आहे. यामुळे हलक्या वाहनांसाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मार्ग खुला करण्यात आल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच हलक्या वाहनांची ७० टक्के वाहतूक मिसिंग लिंकवर वळली होती. पण अवजड वाहनांना सध्या मिसिंग लिंकवर सहा महिने बंदी आहे. त्यामुळे अवजड वाहनं अजूनही या सहापदरी मार्गावरून प्रवास करतात. तसेच, दरवर्षी माहमार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या वाहनांना हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार होणं गरजेचं आहे.
या वर्षात जर राज्य सरकारकडून प्रस्ताव मंजूर झाला तर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) मॉडेल अंतर्गत निविदा काढली जाईल. त्यानंतर २०२७ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून २०३० पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. सुधारित प्रस्तावामध्ये प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेवर लक्ष देण्यात आलं आहे. विद्यमान वाहतुकीतून मिळणारा महसूल प्रकल्पाचं भांडवल आणि परिचलन खर्च भागवण्यासाठी पुरेसा असल्याचं MSRDCचं मत आहे.
२०२७ मध्ये काम सुरू होण्याची शक्यता
“आम्ही सुधारित प्रस्ताव सादर केला असून आता फक्त सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निश्चित सवलतीच्या कालावधीत वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलीच्या आधारे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचं मूल्यांकन केलं जात आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर BOT मॉडेल अंतर्गत कंत्राटदार नेमण्यात येईल. २०२७ मध्ये काम सुरू केल्यास हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी २०३० मध्ये वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, मुंबई आणि पुणे शहरांमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या कॉरिडोरचा विस्तार करणं महत्त्वाचं आहे. तसेच, दोन्ही भागांत सुरू होणाऱ्या नव्या विमानतळांना ध्यानात घेऊन हा महत्त्वाचा दुवा विकसित करण्यावर भर देणं महत्त्वाचं आहे,” असं मत MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
नवी मुंबईतील कळंबोलीपासून पुण्यातील किवळेपर्यंत २००२ मध्ये ९४.६ किमी लांब मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला होता. हामहामार्गा आठवड्याच्या दिवशी ६५,००० वाहनांची वाहतूक हाताळतो. वीकेंडला हीच संख्या एक लाखावर पोहोचते. तसेच, दरवर्षी वाहनांची संख्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. देशातील सर्वात व्यस्त द्रुतगती महामार्गांपैकी एक असलेल्या मार्गावर वाहतूक सुरू ठेवून विस्ताराचं काम करणं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतींनी बांधकाम करण्याची गरज असेल.

