Headlines

Rajesh Kumar : सद्गुरूंचा सल्ला लोकप्रिय अभिनेत्यासाठी ठरला चुकीचा! कर्जबाजारी झाला, लेकाच्या शाळेबाहेर विकल्या भाज्या; काय घडलेलं?


Rajesh Kumar : सद्गुरूंच्या सल्ल्यावरून अभिनेता राजेश कुमारनं शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे तो कर्जबाजारी झालेला.

Rajesh Kumar Farming Debt
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – २०१७ मध्ये, अभिनेते राजेश कुमारनं अभिनय सोडून बिहारमधील त्याच्या मूळ गावी, गया येथे शेती करण्यास सुरुवात केली. हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक असला तरी, राजेशसाठी तो आध्यात्मिक गुरू सद्गुरूंनी दिलेला आदेश होता. पुढील पाच वर्षांत, राजेशवर २ कोटी रुपयांचं प्रचंड कर्ज झालं आणि त्याच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. अभिनेत्यानं आपल्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपालादेखील विकला. याबद्दल अभिनेत्यनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

राजेश कुमारला आलेलं अपयश

राजेश कुमार नं सांगितलं की, तो आधीपासून सद्गुरूंचा अनुयायी नव्हता, पण नंतर झाला. सद्गुरूंच्या शब्दांचा त्याच्यावर प्रभाव पडला आणि त्यानं सर्व काही सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. राजेश कुमार म्हणाला की, ”रॅली फॉर रिव्हर्स’ मध्ये सद्गुरू सतत एक गोष्ट सांगत होते, ‘मला तुमच्या राज्यातील १०० तरुण द्या, मी शेतीचे स्वरूप बदलून दाखवेन. पण तीन वर्षे मला विचारू नका की, माझ्या भविष्याचं काय?’ जेव्हा मी माझ्या गावी पोहोचलो, तेव्हा मला अचानक त्या वाक्याचा अर्थ समजला.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

‘मला जाणवलं की, शेतकऱ्यांना कीटकनाशकं वापरू नका असं सांगण्यापेक्षा, शेतात उतरून मूळ समस्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी शेतकरी झालो. मी बागायती शेतीचा प्रयत्न केला आणि त्यात मी अपयशी ठरलो. पण सद्गुरूंच्या कृपेमुळे मी याला अपयश म्हणणार नाही. मला याचं आता काही वाटत नाही, कारण मला याला यश किंवा अपयश म्हणायचं नाही. यातून मला खूप काही शिकायला मिळालं, जे इतर कुठे शिकता आलं नसतं’

Maharashtra TimesAayush Bhide : ‘तो खूप वाईट काळ होता’, करोनात आई-वडिल गेले, न खचता आयुषनं पूर्ण केलं बाबांचं स्वप्न, सांगितला कठीण काळ
‘मी रोपं लावली आणि जवळपास ३५ वर्षांनंतर त्या भागात भीषण महापूर आला आणि सगळं वाहून गेलं. तरीही मी हार न मानता पुन्हा १५,००० झाडे लावली, पण करोना काळात सर्व प्रयत्न वाया गेले. मी पुन्हा झाडे लावली, पण यावेळी पाणीटंचाईचा फटका बसला. हा माझा शेवटचा प्रयत्न होता. माझ्याकडे जे काही पैसे उरले होते, त्यातून मी विहिरीसाठी ५०० फूट खोल ड्रिलिंग केलं, पण पाण्याचा एक थेंबही लागला नाही. या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. अध्यात्मामुळे मला कधीही काळजी, डिप्रेशन, संताप किंवा चिडचिड या गोष्टी जाणवल्या नाहीत. काहीच घडत नव्हतं आणि ते मला दिसत होतं, तरीही माझे प्रयत्न थांबले नाही. हेच अध्यात्म आहे.’ असं राजेशनं पुढे सांगितलं. ‘द मिस्टिक वर्ल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश बोलत होता.

Maharashtra TimesPrajakta Mali : प्राजक्ता माळीचं चाहत्यांना खास सरप्राइज, नव्या लूकसह शेअर केली आनंदाची बातमी
दरम्यान, कर्जबाजारी झाल्यानंतर राजेशनं पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत राजेशनं सांगितलेलं की, त्याचं आता कर्ज कमी होऊन कर्जाची रक्कम २० लाखांवर पोहोचली आहे.