Headlines

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! गंभीर आरोप करत महिला जिल्हाप्रमुखांचा सेनेला जय महाराष्ट्र


Shivsena News : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने शिर्डीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली असतानाच पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Vimal Punde
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, अहिल्यानगर: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एकीकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने शिर्डीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली असतानाच पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांच्यासह अनेक प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.

राजीनामा देताना विमल पुंडे म्हणाल्या की, “१९८३ पासून, म्हणजेच तब्बल चार दशकांपासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुंडे परिवाराने शिवसेनेचे काम केले आहे. मात्र, आज शिर्डी मतदारसंघात बाळासाहेबांचे विचार शिल्लक राहिले नाहीत,” असा गंभीर आरोप करत पुंडे परिवाराने शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

Maharashtra TimesAhilyanagar News : आमदारकी गेली तरी चालेल, पण रेल्वेमार्ग होऊ देणार नाही, प्राजक्त तनपुरेंचा सरकारला थेट इशारा

“​१ टक्का कार्यकर्ते, ९९ टक्के ठेकेदार”

राजीनामा देताना विमलताई पुंडे यांनी पक्षातील अंतर्गत कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. “पक्षवाढीसाठी वरिष्ठांकडून भरीव आर्थिक पाठबळ दिले जात आहे, परंतु त्यातून पक्ष वाढण्याऐवजी गटबाजी आणि राडेबाजी प्रचंड वाढली आहे. पक्षात सध्या १ टक्का सामाजिक कार्यकर्ते आणि ९९ टक्के पुरुष व महिला ठेकेदार पदाधिकारी उरले आहेत,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

Maharashtra TimesSachin Ahir : ट्रम्पला आणा, पण नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा; सचिन अहिर यांचा सरकारला बोचरा टोला

“अपात्र व्यक्तींचा वरचष्मा”

स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरून आलेल्या आणि सार्वजनिक जीवनात गंभीर आरोप असलेल्या अपात्र व्यक्तींना पक्षात स्थान दिले जात असून, वरिष्ठांकडूनही त्यांनाच पाठबळ मिळत आहे. अशा वातावरणात आणि जिथे गुणवत्तेपेक्षा पात्रतेचा अभाव असलेल्या लोकांचा वरचष्मा आहे, तिथे स्वाभिमान जपून काम करणे अशक्य झाल्यानेच दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा