![]()
जनरल डगलस मॅकआर्थर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे– ‘जुने सैनिक कधी मरत नाहीत, ते फक्त विसरलेजातात’. गेल्या आठवड्यात एका महान माजीसेनाध्यक्षांच्या स्मृतीच्या निमित्ताने हेच वास्तव समोरआले. या सेनाध्यक्षांना मारेकऱ्यांनी आपल्या गोळ्यांचेलक्ष्य बनवले होते. दोन ‘महावीर चक्र” (एमव्हीसी)मिळालेल्या केवळ सहा भारतीयांमध्ये त्यांचा समावेशहोता. 1965 आणि 1971 च्या युद्धात दाखवलेल्याअतुलनीय शौर्याबद्दल त्यांना हे सन्मान मिळाले होते. पुढे तेभारताचे 31 वे भूदलप्रमुख बनले आणि 31 जानेवारी1986 रोजी या पदावरून निवृत्त झाले. त्याच वर्षी पुण्यातदोन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. गेल्या 10 तारखेलात्यांची 40 वी पुण्यतिथी होती. पण कुठेही कोणतीही स्मृतीसभा झाली नाही. कोणीही त्यांचे स्मरण केले नाही. अगदीलष्कराच्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक ट्विटसुद्धाझाले नाही. ते होते जनरल अरुण श्रीधर वैद्य. ‘असल उत्तर”/ खेमकरण क्षेत्रातील लढाईत वैद्य यांनी 9कॅव्हलरी (डेक्कन हॉर्स) रेजिमेंटचे नेतृत्व केले होतेपाकिस्तानी सैन्याच्या आर्मर्ड डिव्हिजनचा सफाया केलाहोता. यानंतर बसंतर, चकरा,देहिरा येथील रणगाड्यांच्यालढाईत त्यांनी 16 (इंडिपेंडंट) आर्मर्ड ब्रिगेडचे शानदारनेतृत्व केले. ‘असल उत्तर”/खेमकरणची लढाई ही याउपखंडातील सर्वात विनाशकारी व निर्णायक लढायांपैकीहोती. तेथे वैद्य यांची रेजिमेंट आघाडीवर होती. युद्धातीलअनुभवांच्या आधारे इंदिरा गांधी यांच्या सरकारने 1983मध्ये वैद्य यांना भूदलप्रमुख बनवले होते. वास्तविक पाहताले. जनरल एस. के. सिन्हा हे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ होतेआणि त्यांचीच वेळ होती. निर्णयाला राजकीय रंगही दिला गेला. जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेल्याजवळीकीची शिक्षा सिन्हा यांना भोगावी लागल्याचे म्हटले गेले. त्या काळी पंजाबमधील परिस्थिती बिघडत होती. कायदा-सुव्यवस्था राखणे हे लष्कराचे काम नसतानाही सुवर्णमंदिर मुक्त करण्याची जबाबदारी वैद्य यांच्यावरआली. 1962 च्या पराभवानंतर ऑपरेशन ब्लूस्टार हीलष्करी इतिहासातील सर्वात वेदनादायी घटना मानलीजाते. कट्टरवाद्यांनी एक हिट लिस्ट तयार केली होती. यात पहिली हत्या इंदिरा गांधी यांची झाली. त्यांच्या पाठोपाठ ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणाऱ्या जनरल्सचा नंबरहोता – वैद्य, कृष्णस्वामी सुंदरजी (ऑपरेशन ब्लूस्टार दरम्यानचे वेस्टर्न आर्मी कमांडर), त्यांचे चीफ ऑफस्टाफ ले. जनरल रणजीत सिंह दयाल आणि डिव्हिजन कमांडर मेजर जनरल के. एस. ‘बुलबुल” ब्रार. या हिट लिस्टमध्ये दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची नावेही होती. पैकी ललित माकन व अर्जुन दास यांची दंगलीच्या काही महिन्यांतच हत्या झाली. यानंतर ‘खालिस्तान कमांडो फोर्स”च्या दोन मारेकऱ्यांनी बँका लुटल्या, पोलिसांचीहत्या केली. लष्कराच्या कमांडर्सच्या मागे लागले.हरजिंदर सिंह ‘जिंदा” आणि सुखदेव सिंह ‘सुक्का” यांनी लुधियानामध्ये (5.7 कोटी रुपयांची) बँक दरोडाटाकला. त्यानंतर त्यांनी मुंबईत डाका घातला. ते वैद्य यांनाघेरण्याचा प्रयत्न करत होते. पण गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्रपोलीस किंवा लष्कर कोणीही सतर्कता दाखवली नाही.वैद्य यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा एकच गनमॅन तैनातहोता. हल्लेखोरांनी शेजारी येऊन वैद्य यांच्या डोक्यातगोळी झाडली. मारुती कारमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्यापत्नी भानू यांनाही चार गोळ्या लागल्या. सुदैवाने त्यावाचल्या. सुक्का व जिंदा यांना नंतर पकडले. येरवडातुरुंगात खटला चालला व 1992 मध्ये त्यांना फाशी झाली. आपण ‘निर्दोष” आहोत, कारण वैद्य याच शिक्षेस पात्रहोते, असे त्यांचे म्हणणे होते. ही बातमी आता दोनमुद्द्यांभोवती फिरते. पहिला मुद्दा असा की,जिंदा-सुक्काचा खटला चालला तेव्हा पंजाबकट्टरवाद्यांच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. सर्वसंस्था हतबल झाल्या होत्या. पंजाब सरकारचे माजी मुख्यसचिव रमेशंदर सिंग यांनी त्यांच्या ‘टर्मोइल इन पंजाब”(हार्पर कॉलिन्स, भारत, 2022) या अधिकृत पुस्तकातलिहिल्याप्रमाणे, ‘मीडिया पूर्णपणे शरण गेला होता”. जिंदाआणि सुक्का यांनी लिहिलेले 21 पानांचे पत्र 26 जुलै 1990रोजी प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या दिवशीअनेक वृत्तपत्रांनी अंश छापले. ले. जनरल ब्रार यांच्यावरही30 सप्टेंबर 2012 रोजी लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला.त्यांनी तो हल्ला मोडून काढला. वैद्य यांच्याशी माझीपहिली भेट एका उदास सकाळी योगायोगाने झाली होती.त्याच्या आदल्या दिवशी, 19 फेब्रुवारी 1982 रोजी नागाबंडखोरांनी शीख रेजिमेंटच्या 21 व्या बटालियनच्याताफ्याला घेरून हल्ला केला होता. त्यात एका मेजरसह20 सैनिक मारले गेले होते. त्याकाळी कोलकाताहूनइंफाळची फ्लाईट गुवाहाटीमार्गे जात असे. वैद्य त्यावेळेसईस्टर्न आर्मी कमांडर होते आणि कोलकाताहून याचविमानात बसले होते. मी गुवाहाटीला पोहोचलो आणितेथून त्यांच्यासोबत विमानात चढलो. त्या घटनेमुळेचआम्ही दोघे हल्ल्याचे ठिकाण असलेल्या उखरुलमहामार्गावरील नामथिलोककडे जात होतो. उदास असलेल्या जनरलचे मन हलके करण्यासाठी मीसहानुभूती व्यक्त केली आणि सैनिकांच्या मृत्यूवर दुः खव्यक्त केले. त्यावर वैद्य यांनी उत्तर दिले होते: “तुम्हालाआमचा पेशा समजणार नाही. लोक मारले जातात . हृदयकमकुवत आहे ते सैनिक बनू शकत नाहीत.’ वैद्ययांच्यासोबत झालेल्या संभाषणातील दोन गोष्टी मलास्पष्ट आठवतात. पहिली गोष्ट म्हणजे देशवासियांचासामना करताना निर्माण होणारी द्विधा मनःस्थिती. त्यांचेमत अगदी स्पष्ट होते : “देशाच्या कायदेशीर निवडूनआलेल्या सरकारविरोधात कोणी शस्त्र उचलल्यासत्याला देशद्रोहीच म्हटले जाईल. आमची शत्रूची व्याख्याहीच आहे.’ वैद्य यांना जिवाला धोका असल्याचा इशाराअनेकदा देण्यात आला होता. त्यावर त्यांचेतत्वज्ञानासारखे उत्तर असायचे : “मी दोन युद्धे लढलोआणि सुरक्षित बाहेर आलो. एखाद्या गोळीवर माझे नावलिहिले असेल, तर ती मला शोधून काढेलच.” 10ऑगस्ट 1986 रोजी नेमके हेच घडले. वैद्य यांना आपणविसरून गेलो. आपल्या सर्व माजी सैनिकांना, महानयुद्धवीरांना तसेच विसरून जायचे का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्वकर्तेकायदा – सुव्यवस्था राखणे हे लष्कराचेकाम नव्हते. तरी सुवर्णमंदिर मुक्तकरण्याची जबाबदारी वैद्य यांच्याखांद्यावर आली. ऑपरेशन ब्लूस्टार हीलष्कराच्या इतिहासातील वेदनादायीघटना आहे. कट्टरवाद्यांनी ‘हिट लिस्ट”तयार केली होती. त्यात पहिली हत्याइंदिरा गांधी व नंतर ऑपरेशनचे नेतृत्वकरणाऱ्या जनरल्सचा नंबर होता.
Source link
शेखर गुप्ता यांचा कॉलम:आपल्या महान युद्धवीरांचे स्मरण ठेवणे गरजेचे
