![]()
गेल्या आठवड्यात दिल्लीत ‘रचनात्मक काँग्रेस”च्याएका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य केले. दौऱ्यांदरम्यान परदेशीनेत्यांना मिठी मारण्याच्या त्यांच्या सवयीची त्यांनी टरउडवली. तिथे उपस्थित तरुण प्रेक्षक या टवाळीवरहसले खरे, पण काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी यातइटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नावओढल्याने ही बाब अधिकच आक्षेपार्ह ठरली. विरोधीपक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी टवाळी करण्याच्या याधोरणावर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीआहे. अशा प्रकारच्या उपहासातून व्यासपीठावर टाळ्यामिळतील आणि हेडलाईन्सही बनतील. मात्र, सरकारचे परराष्ट्र धोरण समजून घेऊन त्यावर केलेली योग्य टीका आणि यात फरक असतो. जनता विरोधी पक्षनेत्याकडून नेहमीच काहीतरी ठोस विचारांची अपेक्षा करते. निवडणुकीत योग्य पर्याय निवडण्यापूर्वी जनतेला विचार करायला जागा हवीअसते. संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्षनेता हासत्ताधाऱ्यांवर टीका तर करतोच, पण सोबतचधोरणांचा एक सक्षम पर्यायही देशासमोर ठेवतो. गेल्या12 वर्षांत राहुल गांधी यांची ‘पप्पू” अशी प्रतिमा तयार करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला. त्यामुळेच राहुल गांधीआता पंतप्रधानांच्या प्रतिमेला छेद देण्यासाठी त्याचतीव्रतेने पलटवार करत आहेत. पण यामुळे देशातीलराजकीय चर्चेचा स्तर मात्र दुर्दैवाने घसरला आहे.काळासोबत राजकारण बदलते आणि ते बदललेहीपाहिजे. राहुल गांधी यांनी 2022 मध्ये 145 दिवसांची‘भारत जोडो यात्रा” काढली होती. या यात्रेच्यामाध्यमातून त्यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्नकेला. दक्षिणेतील कन्याकुमारीपासून उत्तरेतीलश्रीनगरपर्यंत ही यात्रा 4,000 किलोमीटरहून अधिकचालली. त्यावेळी त्यांचा निश्चय, मेहनत आणिसर्वसामान्यांशी साधलेला संवाद यामुळे भाजपबॅकफूटवर गेला होता. 2024 च्या सार्वत्रिकनिवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. काँग्रेसनेलोकसभेतील आपल्या जागा 99 पर्यंत वाढवल्या.एवढेच नाही तर भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखले.त्यामुळे भाजपला आघाडी सरकार स्थापन करणे भागपडले. अलीकडेच देशभरात तरुणांनी उभारलेल्याआंदोलनांनंतर राजकारणातील समीकरणे बदलण्याचीशक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांना याआंदोलनातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा फायदा घ्यायचाअसेल, तर त्यांना आपली प्रतिमा पुन्हा एकदा बदलावीलागेल. त्यांची ‘पप्पू” ही प्रतिमा आता पुसली गेली आहे.पण आता राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणत्याविचारांच्या आणि धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हेस्पष्टपणे सांगायला हवे. भविष्यात काँग्रेसचे किंवाकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार आल्यासदेशवासीयांसाठी त्याचा काय अर्थ असेल, हे त्यांनीमांडले पाहिजे. विशेषतः तरुण मतदारांसाठी ही बाबअत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 12 वर्षांपासून निर्माणझालेली शांततेची भिंत या तरुणांनी पाडली आहे.लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत.अशा वेळी काँग्रेसला आपल्या विजयाची शक्यतावाढवायची असेल, तर राहुल गांधी यांना सरकारलासतत खाली खेचणारे नकारात्मक राजकारण सोडावे लागेल. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवणाऱ्याव्यक्तीकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा असते. आपणराहुल गांधी यांना ‘अँग्री यंग मॅन”च्या रूपात पाहिलेआहे. रस्त्यावर उतरून लढा देणारा नेता म्हणूनहीपाहिले आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा ट्रोल करणाराअंदाजही आपण पाहिला. पण काँग्रेस पुढची निवडणूकजिंकली, तर राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात कायनवीन विचार घेऊन येतील, याबद्दल देशात अजूनहीस्पष्टता नाही. आतापर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्षतेपासून ते‘मोहब्बत की दुकान”, ‘पाच न्याय”, जातीनिहायजनगणना आणि आता विद्यार्थ्यांची आंदोलने अशाअनेक मुद्द्यांना आणि घोषणांना हाताळून पाहिले आहे. पण आगामी काळात राहुल गांधी यांच्यासमोरील सर्वातमोठे आव्हान ते स्वतःच आहेत. उपहास आणि तिखटटीकेला त्यांनी राजकारणाची ओळख बनवले आहे.आता ते ही शैली बदलून एक विश्वासार्ह राजकीयविचार मांडू शकतील का? याद्वारे 2029 मध्ये काँग्रेसएक उत्तम पर्याय म्हणून समोर येईल? ( लेखिकेच्या हे वैयक्तिक मत आहे.) राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणतेविचार, धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हेस्पष्टपणे सांगायला हवे. काँग्रेसचेसरकार आल्यास त्याचादेशवासीयांसाठी काय अर्थ असेल, हेत्यांनी मांडले पाहिजे. तरुणांसाठी हीबाब खूप महत्त्वाची आहे.
Source link
आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला आता विरोधी पक्षांकडून सकारात्मक विचारांचीही अपेक्षा
