Headlines

Aditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहन – aditya thackeray slams bjp over ram mandir donation scam and nashik simhastha kumbh mela


म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चंदाचोरीप्रमाणेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांतही घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. ‘मंदिरातील दानपेटी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातून पैसे काढण्यावरच भाजपचे लक्ष आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. सिंहस्थ कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत, सत्ताधारी आमदार आणि नगरसेवकांना रस्त्यावर थांबवून ‘आमचे पैसे कुठे गेले?’ असा जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी नाशिककरांना केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांतील निकृष्ट दर्जा, शहरातील खड्डे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी गुरुवारी नाशिक दौरा केला.

Maharashtra TimesNashik Crime : केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त‘सिंहस्थ कामांचे पैसे कोणाच्या खिशात गेले? देशात चंदाचोरीवर प्रश्न विचारला, की लगेच हिंदूविरोधी ठरवले जाते. राम मंदिरासाठी आम्हीही दान दिले, लोकांनीही दान दिले; मग प्रश्न विचारायचा नाही का?’ असा सवाल ठाकरे यांनी केला. भाजप साधू-महंतांचा निवडणुकीत वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘हा निर्णय प्रशासकीय नसून राजकीय आहे. त्यामुळे या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे,’ अशी मागणी ठाकरे यांनी केली. शहरातील खड्डे आणि सिंहस्थ कामांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर्फे सोमवारी, १७ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘हा मोर्चा ताकदीचा असेल. नाशिककरांनी विचारधारा बाजूला ठेवून नाशिककर म्हणून एकत्र यावे आणि मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले.

भाजप मोठा मासा

कुंभमेळा कामांतील कथित बनावट कार्यारंभ आदेशांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांनी ‘बनावट कंत्राटदारांचे आदेश काढणारे छोटे मासे आहेत; भाजप हा मोठा मासा असून शहर गिळायला निघाला आहे,’ असा आरोप केला. मुंबईत मुख्यमंत्री आपल्या मित्रांना जमीन देत असल्याचा आरोप करीत, भाजपच्या एका आमदाराला १६ एकर जमीन देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या एका आमदाराच्या साखर कारखान्याला १८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप करीत, ‘स्पेशल केस म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिकला निधी द्यावा,’ अशी मागणी ठाकरे यांनी केली.

Maharashtra TimesNashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्तनाशिकमध्ये ठेकेदारांचा धुमाकूळ

मुंबई-नाशिक महामार्गामुळे लॉजिस्टिक वाढेल, उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र चार वर्षांत परिस्थिती सुधारण्याऐवजी खड्डेच वाढले, असा आरोप ठाकरे यांनी केला. ‘समृद्धी महामार्गावरही चार वर्षांत पॅचवर्क सुरू आहे. नाशिकमधील डांबरी रस्ते खराब झाले आहेत. आधीचे रस्ते चांगले होते, असे नाशिककर सांगत आहेत. नाशिकमध्ये ठेकेदारांनी धुमाकूळ घातला आहे,’ असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले…
-मी पाहणीला जाणार असल्याचे कळताच काही रस्ते रात्रीतून दुरुस्त करण्यात आले. भाजपने नाशिककरांची अवस्था वाईट करून ठेवली आहे,’
-नाशिकसाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, चाकणप्रमाणेच नाशिकमधील उद्योगही स्थलांतरित होण्याची भीती
-खड्ड्यांच्या जबाबदारीवरून महापालिका आणि नाशिक कुंभमेळा प्राधिकरण एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत