Headlines

Mumbai Landslide: डोंगराखाली मृत्यूची छाया; गेल्या 35 वर्षांत मुंबईत दरड कोसळून 340 जणांचा करुण अंत, तीनशे जखमी – over the past 35 years 340 people lost their lives 300 injured in mumbai landslide


Mumbai Landslide: मुंबईत १९९२ ते २०२६ या कालावधीत दरडी कोसळून ३४० जणांचा मृत्यू, तर ३०० जण जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-13T122047
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई: मुंबई महानगरातील जुन्या व धोकादायक इमारती, चाळींप्रमाणेच डोंगराळ भागातील हजारो रहिवासीही जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहेत. घाटकोपर, भांडुप, कुर्ल्यासह विविध भागांतील डोंगराळ वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कुर्ल्यात बुधवारी डोंगराळ भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या ३५ वर्षांत, म्हणजे १९९२ ते २०२६ या कालावधीत मुंबईत विविध ठिकाणी दरडी कोसळून ३४० जणांना जीव गमवावा लागला, तर सुमारे ३०० जण जखमी झाले, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

पावसाळ्यापूर्वी मुंबई आणि महानगरातील धोकादायक ठिकाणांची संबंधित महापालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासह (एसआरए) विविध यंत्रणांकडून पाहणी केली जाते. या पाहणीनंतर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. डोंगराळ भागातील धोकादायक घरांतील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात या वस्त्यांवरील दरडींचा धोका कायम राहतो.

Maharashtra TimesPresident Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेतमुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघांमध्ये तब्बल २५७ ठिकाणी डोंगराळ भागातील वस्त्या धोकादायक म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. येथील २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांतील रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची शिफारस म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य सरकारकडे केली होती. उर्वरित झोपड्यांच्या सुरक्षेसाठी टेकड्यांच्या सीमेलगत संरक्षक भिंती उभारण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने सन२०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तातडीने उपाययोजना झाली असती, तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते; मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झाली नसल्याकडेही लक्ष वेधले जात आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता मोठ्या कंपन्यांना दणका; मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज् पिझ्झाच्या ५ आउटलेटचा परवाना रद्द, तपासणीत काय आढळलं?घाटकोपरमध्ये वारंवार दुर्घटना
-१२ जुलै २००० : मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला. या दुर्घटनेत ७८ जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये २७ पुरुष, १५ महिला, १५ मुलांचा समावेश
-५ जुलै २०२२ : पंचशीलनगरमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले; मात्र जीवितहानी झाली नाही.
-१२ एप्रिल २०२४ : घाटकोपर पश्चिमेकडील हिमालय सोसायटी, वाल्मिकनगर परिसरात दरड कोसळली. महापालिकेने तातडीने १० ते १२ झोपड्या रिक्त केल्याने मोठी दुर्घटना टळली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा