Headlines

Gadchiroli Snake Bite Student Death: जपतलाईचा सर्पदंश – gadchiroli dhanora niwasi ashram school three students died of snakebite


Gadchiroli Snake Bite Three Student Death: गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तिथे सुविधांचा अभाव आहे. मुलींना सकस जेवण मिळत नाही, झोपायला पलंग नाहीत. जमिनीवर गादी टाकून झोपावे लागते. वसतिगृहास लागून दगड-विटांचे ढिगारे आहेत.

ashram shala
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करून, आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या, दमल्याभागल्या मुलींच्या खोलीत सापाचे सहज घुसणे, सहा निरागस मुलींना दंश करणे, त्यातील तिघींचा जीव जाणे आणि तिघींचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असणे ही बाब प्रगतिशील महाराष्ट्रासाठी भूषणावह नव्हे.

आदिवासी भागात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी होणारे प्रयत्न, आदिवासी मुलींनी अधिकाधिक शिक्षण घेत मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे म्हणून सुरू असलेली धडपड या सगळ्यांवर अशा घटना पाणी ओततात. त्याच वेळी सुरक्षा यंत्रणा, कागदावर किती मजबूत आणि प्रत्यक्षात मात्र किती कमकुवत आणि दुबळ्या असतात, यावर प्रकाश टाकतात. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई या गावातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ही घटना घडली. तिथे पहिली ते दहावी वर्गात २२३ मुले शिक्षण घेतात. मुलींसाठी वसतिगृह आहे.

लाकडांच्या थप्प्या आहेत. तिथे साप-विंचवांचा खुला वावर आहे. त्यातील एका विषारी सापाने खिडकीतून प्रवेश केला. एकापाठोपाठ एक मुलींना दंश केला. त्यातील दोघींना दहा किलोमीटवर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी न्यायचे तर रस्ता नीट नाही. पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून त्यांना न्यावे लागले. अशा वेळी ‘गोल्डन अवर्स’मध्ये सुविधांची काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्याने एक गंभीर मुलगी नागपुरात उपचारार्थ आणली गेली. आता त्यांच्याच आदेशाने आश्रमशाळेचा परवाना निलंबित होणार आहे.

मुख्य सचिव बैठक घेऊन सुरक्षेची दिशा ठरविणार आहेत. ही शाळा काँग्रेसच्या नेत्याची असल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटतील. ज्या मुलांचे जीव गेले, त्यांचे काय, त्यांच्या पालकांचे काय? ते नुकसान आर्थिक मदतीतून कसे भरून निघणार? आश्रमशाळेतील इतर मुलांवर ही वेळ येऊ नये म्हणून सुरक्षा आणि सुविधा यांची व्यवस्था केली जाईल का, हा खरा प्रश्न आहे. ही घटना सर्पदंशाची आहेच; मात्र व्यवस्थेला निष्काळजीपणाचे सर्प किती घट्ट वेटोळे करून बसलेत हे दर्शविणारी आहे. मुलींच्या हाती पुस्तक असावे, असे वाटत असेल तर तिला सुरक्षा द्यावी लागेल. त्यासाठी असुविधांचे सर्प ठेचावे लागतील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा