Intense rain in mumbai despite el nino confusion in imd weather department alert; पावसाचा चकवा, एल निनो असतानाही वाढते पाऊसमान; हवामान खातेही बुचकळ्यात
Intense rain in mumbai despite el nino confusion in imd weather department alert; पावसाचा चकवा, एल निनो असतानाही वाढते पाऊसमान; हवामान खातेही बुचकळ्यात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवलेला असताना पश्चिम उपनगरांमध्ये मंगळवारी रात्रीनंतर पावसाचा जोर थोडा वाढला. यासोबत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाजही वर-खाली होताना दिसला.
सकाळी ९ वाजता दिलेल्या अंदाजामध्ये मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवली होती, ठाण्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर १२.३४ वाजताच्या अंदाजानुसार मुंबई, तसेच ठाण्यालाही बुधवारी यलो अलर्ट अद्ययावत करण्यात आला. त्यानंतर १२.५६ वाजता दिलेल्या अंदाजानुसार मुंबईचा यलो अलर्ट मागे घेण्यात आला. रायगडचा बुधवारसाठीचा ऑरेंज अलर्ट अद्ययावत करून ‘यलो’ करण्यात आला आणि गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट करण्यात आला.
मुंबईवर बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाळी ढग दिसत असल्याची माहिती काही हवामान अभ्यासकांनी दिली. या ढगांमुळे तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही अधिक होता. दहिसर अग्निशमन दल केंद्र येथे २८ मिलीमीटर, तर जोगेश्वरीच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय येथील केंद्रावर २५.२ मिलीमीटर पावसाची नोंद सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या १२ तासांमध्ये झाली. उर्वरित बहुतांश केंद्रांवर ५ ते १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र या ढगांमुळे प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट दिला असेल, असे काही हवामान अभ्यासकांनी सांगितले. मात्र हा अलर्ट काही मिनिटांमध्ये मागे घेण्यात आला.
एल निनो असतानाही वाढते पाऊसमान
मुंबईमध्ये, तसेच कोकण विभागात २९ जुलैपासून फारसा पाऊस पडलेला नाही. मुंबई शहरामध्ये या आठवड्याच्या सरासरीच्या ८० टक्के, तर उपनगरामध्ये ५६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. मात्र जुलैने पाऊसमानामध्ये मोठी वाढ केल्याने मुंबई उपनगरात पावसाने मोठा टप्पा गाठला आहे. ५ ऑगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ केंद्रावर १,९८०.६ मिलीमीटर एकूण पर्जन्यमान नोंदले गेले. कुलाबा येथे १,६४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी कुलाबा येथे २.४, तर सांताक्रूझ येथे ६.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरच्या पावसानेही मोठा टप्पा गाठला असून १ जूनपासून महाबळेश्वर येथे ४,७९४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. बुधवार २४ सकाळपर्यंतच्या तासांमध्ये एकूण ८६ मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर येथे नोंदला गेला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा