Pimpri Family Death Case : एकाच कुटुंबातील तीन जणांनी मध्यरात्री विषारी औषध पेटत्या कोळशावर टाकून त्याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पिंपरी : आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) या दोघींचा वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.
अजमेरा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी येथील एकाच कुटुंबातील तीन जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विषारी औषध पेटत्या कोळशावर टाकून त्याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध झाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
आयुष्य संपवण्यापूर्वी विनोद यांनी शेवटची नोट लिहिली होती. त्यामध्ये आपण सर्व जण स्वखुशीने पाऊल उचलत असल्याचे म्हटले होते. आर्थिक विवंचनेतून हे कृत्य करीत असलो, तरी यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असेही त्या चिठ्ठीत म्हटले होते. ते तिघेही उच्चशिक्षित होते. त्यांना त्रास देऊन कोणी जीवन संपवण्यास प्रवृत्त केले का, याचा तपास पोलिस करीत आहेत. मयत तिघांचेही मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. टोकाचं पाऊल उचलण्यासाठी त्यांनी ऑनलाइन शोध घेतला होता काय, याचाही तपास संत तुकारामनगर पोलिस करीत आहेत.
Maharshtra government चा योजनांचा पाऊस, पण तिजोरीत खडखडाट, शेतकरी सम्मान योजना बंद करण्याची तयारी?
मृत विनोद यांनी ‘आयआयएम, अहमदाबाद’ येथून ‘मास्टर्स इन कंप्युटर सायन्स’चे शिक्षण पूर्ण केले होते. मुलगी पौर्णिमाही कंप्युटर सायन्सचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. आई सिरजा नामांकित शाळेत समन्वयक म्हणून काम पाहत होत्या. विनोद नोव्हेंबर २०२४ पर्यंत डॉन बॉस्को या कंपनीत कामाला होते. पिल्लई कुटुंबीय नेहरूनगरमध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांनी आर्थिक विवंचनेतून आपले राहते घर विकले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा