Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका विश्वासार्ह आणि संयमी फलंदाजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहते भावुक झाले आहेत. त्याचं भारतीय क्रिकेटमधील योगदान कायम स्मरणात राहील, असं अनेकजण म्हणत आहेत.
ai generated images
अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य आपल्या शांत स्वभावासाठी आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्यानं अनेकदा अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सावरलं आहे. त्यामुळे त्याला संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानलं जायचं. मात्र, १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर त्यानं आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहते भावुक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजिंक्य रहाणेनं भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं ८ हजार ४०० हून अधिक धावा केल्या. यामध्ये १५ शतकं आणि ५० हून अधिक अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही खूप चांगली कामगिरी केली आहे.
२०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्यानं भारताला २-१ असा ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता.
मेलबर्न कसोटीत कर्णधार म्हणून त्यानं झळकावलेलं शतक हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक मानलं जातं.
परदेशी खेळपट्ट्यांवर, जिथे बहुतांश भारतीय फलंदाज अपयशी ठरतात, तिथे अजिंक्य रहाणेनं सातत्याने धावा केल्या. त्यामुळे त्याला संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानलं जायचं.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा