Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देश पुढे जाऊ शकत नाही. लोकशाही संपली असे वाटत होते; पण युवकांनी सिद्ध केले की लोकशाही संपलेली नाही, ती नव्या जोमाने उभी राहत आहे,’ असे कौतुकोद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. युवकांना ‘झुरळ’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत, युवक पेटले तर त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले’
‘जेव्हा न्याय मागूनही मिळत नाही, तेव्हा युवकांच्या हातात दगड येतो. त्यांना दहशतवादी म्हणण्यापूर्वी सरकारने आत्मपरीक्षण करावे. युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Crime News : मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा जीव घेतला, किचनमध्ये बॉडी टाकून अपघात भासवला, एका क्लूने पुरता अडकला ‘आज जनतेचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडाला आहे. नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर’, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विविध पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा संदर्भ देत भाजपला उपरोधिक टोला लगावला.
शिवसेना उबाठाचे प्रवक्ते, जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या ‘मार्मिक प्रकाशनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ या दोन पुस्तकांचे आणि व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संपादन केलेल्या ‘ज्वलंत रेषा बाळ केशव ठाकरे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडले. मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा