Headlines

Mumbai High Court Revoked Bail Order of Ramesh Mhatre And Said Surrender to Police


कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. कारण कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला जामीन मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. तसेच रमेश म्हात्रे यांना उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांनी पोलिसांना शरण जावं अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी, असा आदेशच मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

Ramesh Mhatre
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. रमेश म्हात्रे यांना कल्याणमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंजूर केलेल्या जामिनाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. आज प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने विशेष सुनावणी घेऊन हा अंतरिम आदेश दिला. कल्याणमधील कोर्टाने दिलेल्या जामीन आदेशाविषयी मुंबई हायकोर्टाने सुमोटो दखल घेऊन या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली.

डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या एक महिला डॉक्टर आणि दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावरून रमेश म्हात्रे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका झाली होती. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद उर्फ प्रकाश निकम या तीन आरोपींना अटक केली होती.

मुख्य आरोपी असलेले रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने दबाव वाढल्यानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर न्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्याऐवजी वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. या संपूर्ण प्रकरणाची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी स्वप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या याचिकेमार्फत दखल घेऊन आज, शनिवारी सुनावणी घेतली.

हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना शरण जाण्याचा आदेश

१४ जुलै रोजी कल्याणमधील कोर्टाने दिलेला जामीन आदेश हायकोर्टाने स्थगिती करून रमेश म्हात्रे यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे. तसेच ते शरण आले नाही तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे कठोर निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

हायकोर्टाचं डॉक्टरांना संपावर न जाण्याचं आवाहन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने या प्रकरणावरून सोमवारी राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खंडपीठाने त्याचीही दखल घेत, डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.

खंडपीठाने नेमकं काय म्हटलं आहे?

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना हायकोर्टाने पोलिसांसमोर शरण जाण्यासाठी उद्या, रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत शरणागती पत्कारली नाही, तर त्यांच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच म्हात्रे यांच्याविरोधात यापूर्वी १८ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते, याचीही नोंद खंडपीठाने घेतली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा