Headlines

Uddhav Thackeray Answer to CM Devendra Fadnavis in Nagpur Speech


उद्धव ठाकरे यांनी नागपुरात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली आणि गंभीर आरोप सुद्धा केले.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात प्रसिद्ध राम मंदिरात रामरक्षा पठण करत अनोखं आंदोलन केलं. त्यांनी रामरक्षा पठण केल्यानंतर भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना रामरक्षा पाठ आहे का? असा खोचक सवाल रामरक्षा आंदोलनावरुन केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या नागपुरातील भाषणात प्रत्युत्तर दिलं.

“मला तेही दिवस आठवत आहेत, ज्यावेळेला बाबरीचा लढा झाला होता. बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडण्यात आली, त्यावेळी आज जे सत्तेत बसले आहेत त्यापैकी कुणीही छाती पुढे करुन आला नव्हता. त्यावेळी फक्त केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहिले होते. कारण त्यावेळी भाजपवालेच म्हणत होते की, हे आमचं काम नाही तर असेल तर शिवसैनिकांचं काम असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बाळासाहेबांनी गर्व से करो हम हिंदू घोषणा बुलंद केली’

“मी स्वत: तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की, जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला शिवसैनिकांचा गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू हैं ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी बलिदान केलं. अनेक जण त्यावेळी झालेल्या पोलीस अत्याचारात कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी तो धोका डोक्यावर घेतला होता. अनेकांनी जे बलिदान केलं ते या चोरांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी केलं नव्हतं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“आम्ही मंदिर लुटारुंच्या विरोधात आहोत. फडणवीसांना सांगायचं आहे की आमची टिंगल करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते आधी स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे रामरक्षा पाठ आहे की नाही? बघण्याचं आंदोलन नाहीय. एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका की रामरक्षा पाठ आहे की नाही?”, असं जोरदार प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप

“रामरक्षा म्हणजे आपण म्हणतो की, रामाने आपली रक्षा केली पाहिजे. आज रामभक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारावर करावी लागत आहे. यासारखं हिंदूंचं दुर्दैवं कोणतं? कोणतं असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार नाही. केदारनाथच्या मंदिरात चोरी झाली आहे. बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मंदिराच्या तिजोरीवर डल्ला मारुन आमदार-खासदार विकत घेतल्याचा आरोप

“अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या गेल्या आणि शतपटीने किंमती वाढून ट्रस्टला विकल्या गेल्या आहेत. हे मी नाही तर बाकी सगळे म्हणत आहेत. अनेक जण जे साधू आहेत ते संताप व्यक्त करत आहेत. एका साधूने सांगितलं की, हे मंदिर नाही तर पैसा गोळा करण्याचं भाजपचं केंद्र झालं आहे. काही जण म्हणाले की, तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे तिजोरीवर जो डल्ला मारला गेला त्यातून आमदार-खासदार विकत घेतले गेले”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

फुटीर आमदार-खासदरांना ठाकरेंचं आव्हान

“आज मला त्या गद्दारांनासुद्धा विचारायचं आहे. माझ्यावर आरोप करत होता की, बाळासाहेबांचे विचार सोडले. मी बाळासाहेबांचे विचार घेऊन आजही ठामपणाने उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारुन बघा. तुमच्यात हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल तर त्यांनी मंदिर चोरांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. का नाही करत? कारण ह्यांच्यात दम राहिलेला नाही. लाचार होणार हिंदू नाही”, असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा