जिल्हा परिषद अधिकारी मुंबईत:पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी पोहोचले, कामकाज प्रभावित
अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सर्व खातेप्रमुख पंचायत राज समितीसमोर (पीआरसी) साक्ष देण्यासाठी मुंबईत गेले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, केवळ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सन २०१६ चा लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल आणि…
