Headlines

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी पहिली जलदगती सुनावणी लांबणीवर

► वृत्तसंस्था नवी दिल्लीनीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या जलदगती न्यायालयातील पहिली सुनावणी सोमवारी होणार होती, परंतु पहिल्याच दिवशी ती पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पहिल्या सुनावणीदरम्यान सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे वकील उपस्थित…

Read More

Karad couple caught red-handed preparing artificial milk in fdas raid

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व…

Read More

"मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?":मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे…

Read More

E-20 पेट्रोलवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची मागणी: गडकरी आणि पुरी यांना बडतर्फ करा

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (ई-20) धोरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या धोरणाला “अत्यंत अयशस्वी”, “भ्रष्टाचाराने ग्रासलेले” आणि “ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे” असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना…

Read More

SC on Lathi Charge | पोलिसांकडून होणारी क्रूर मारहाण चिंताजनक विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

► वृत्तसंस्था नवी दिल्लीदेशभरात आणि विशेषत: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या अत्याचारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत टिप्पणी केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला तीव्र शब्दांत फटकारले आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार ही एक घटनात्मक हमी आहे. केवळ आंदोलन होत आहे या कारणावरून आंदोलकांवरील पोलिसांच्या कथित अत्याचारांचे समर्थन…

Read More

दावा- PoK निवडणुकीत मतदान करण्यासाठी लोक घरातून बाहेर पडले नाहीत:विरोध प्रदर्शन तीव्र झाले, आंदोलकांवर गोळीबारात 8 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर (PoK) मध्ये सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निवडणुकीत खूप कमी मतदान झाले आहे. अनेक भागांमध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र, सरकारने अद्याप मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, PoK मध्ये सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. हजारो लोक निवडणूक प्रक्रिया आणि पाकिस्तान सरकारच्या धोरणांविरोधात राजधानी…

Read More

जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड:बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

जालन्यामध्ये हवामान व पर्जन्यमापनात एक अत्यंत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक उपकरणांमध्ये तब्बल चार वेळा छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसतानाही या यंत्रांवर चक्क बर्फाचे तुकडे ठेवून आणि उपकरणाच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवण्याचा हा गंभीर…

Read More

जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा:56 हजार क्युसेक पाण्याची आवक, 9 तासांत 2 टक्क्यांनी वाढ

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. गंगापूरमधून ४९४७ क्युसेक, दारणामधून ५३३० क्युसेक, कडवामधून २३३० क्युसेक आणि पालखेडमधून १९८६ क्युसेक पाणी…

Read More

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More

अमरावती विद्यापीठात प्लँट मेटाबोलाईट रेफरन्स स्टँडर्डस् लाँचिंग:बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातर्फे ‘प्लँट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्स’ च्या लाँचिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुलगुरू कार्यालयात होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे प्रामुख्याने…

Read More