आत्मज्ञानी जरी देवाशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिमा तशीच राहते
माऊली म्हणतात, ज्यांना ईश्वर आपला हितचिंतक आहे ही खात्री असते ते पूर्णपणे त्याच्यावर आपला भार टाकतात आणि प्रेमभराने त्याला शरण जातात ते मायानदी सहजी तरुन जातात पण जे स्वत:ला कर्ता समजत असतात ते मात्र मायानदीत गटांगळ्या खात राहतात. असे लोक दुष्कर्मी, मूर्ख व दुराचारी असतात. त्यांची विचारशक्ती नष्ट झालेली असते. त्यांच्या ज्ञानावर मायेने घातलेल्या अज्ञानाच्या…
