ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात 12 वर्षीय मुलाच्या मेंदूचा चुकीचा एमआयआर अहवाल देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका १२ वर्षीय निष्पाप मुलाच्या मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ‘मेसर्स कृष्णा डायग्नोस्टिक्स प्रा. लि.’ला चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे कडक स्मरणपत्र बजावले आहे.
नेमकं प्रकरण काय?
श्लोक एलिस (वय १२ वर्षे) या बालकाला उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ जुलै २०२६ रोजी रुग्णालयातील कृष्णा डायग्नोस्टिक्स सेंटरमध्ये त्याच्या मेंदूची एमआरआय तपासणी झाली. या तपासणीनंतर कृष्णा डायग्नोस्टिक्सने दिलेल्या अहवालात मुलाच्या मेंदूमध्ये गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले.
दोन दिवसात वेगवेगळे अहवाल
अहवाल पाहून हादरलेल्या पालकांनी तातडीने दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि केवळ दोन दिवसांत मुलाची पुन्हा नव्याने एमआरआय चाचणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या तपासणीत मुलाच्या मेंदूला कसलीही दुखापत नसल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन दिवसांत आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांमुळे निष्पाप मुलाचे पालक प्रचंड मानसिक तणाव आणि भीतीच्या छायेत गेले.
मनविसे आक्रमक
रुग्णांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे आणि कल्याण शहराध्यक्ष अंकुश राजपूत यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे महापालिकेचे आरोग्य उपायुक्त तसेच रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली. निष्पाप बालकाच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि रुग्णांची फसवणूक करणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकावर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करत मनविसेने दोन्ही एमआरआय चाचण्यांचे अहवाल पुरावा म्हणून प्रशासनासमोर सादर केले.
चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश
मनविसेच्या तक्रारीनंतर खडबडून जागी झालेल्या रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी पावले उचलली आहेत. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून कृष्णा डायग्नोस्टिक्सला या प्रकरणाची तत्काळ सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणातील पुढील कारवाईचा अहवाल वेळोवेळी कळवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर प्रशासन नेमकी काय कठोर कारवाई करते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, मनविसे मागणी
“कळवा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळणे अत्यंत अक्षम्य आणि संतापजनक आहे. एका निष्पाप १२ वर्षीय बालकाच्या मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल देणे म्हणजे थेट त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करण्यासारखेच आहे. ‘कृष्णा डायग्नोस्टिक्स’च्या या निष्काळजीपणावर केवळ कागदी चौकशी करून चालणार नाही, तर संबंधित व्यवस्थापनावर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मनविसे हा लढा सुरूच राहील”, अशी प्रतिक्रिया मनविसेचे सरचिटणीस संदीप दिनकर पाचंगे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा