Headlines

वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वेला 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?


मुंबई : पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमाना भारत आणि झिम्बाब्वे संघावर सात विकेटने मात केली. भारताचा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर पहिला विजय ठरला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडची मालिका गमावल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं होत. झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानावर सहज मात देत कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे. सलग सात सामन्यात एकही विजय श्रेयसला मिळवता आला नव्हता. अखेर विजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने कात टाकली आहे.

आजच्या सामन्यामध्ये श्रेयसने सलग आठवा टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यादव बंधूंनी हा निर्णय खऱ्या अर्थाने योग्य ठरवत भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली. या सामन्यामध्ये झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १२५-७ धावा करू शकला. यजमान संघाकडून वेस्ली माधेवेरेने ३९ धावा, ताडिवनाशे मरुमानीने नाबाद २७ धावा आणि रेयान बर्लने २६ धावा केल्या. कॅप्टन सिकंदर रझा याला शिवम दुबे याने माघारी धाडले, त्यामुळे त्यांना डावाला सांभाळण्यााठी कोणताही भरवशाचा खेळाडू राहिल नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दडपण ठेवले. मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २-२ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

झिम्बाब्वे संघाच्या १२६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१ धाव) हा लवकर माघारी परतला. मात्र वैभवने त्याचा शो झिम्बाब्वेला दाखवत दांडपट्टा चालवला. वैभव खेळत असताना त्याने स्ट्राईक देण्यावर सोबतच्या खेळाडूंनी भर दिला. त्यानेही या संधीचे सोने करत १८ चेंडूत ५० धावा केल्या आणि त्यानंतर लगेच आऊट झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.

दरम्यान, भारतीय संघाने १३ ओव्हरमध्ये १२६ धावांचे आव्हान पूर्ण केले. ४० चेंडू राखून ठेवत भारतीय संघाने हा विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये १७ डॉट बॉल टाकणाऱ्या मयंक अग्रवाल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. तर भारताचा दुसरा टी-२० सामना २५ जुलैला होणार आहे.

(भारत प्लेइंग 11): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव