Headlines

मी पाहून घेतो! विराट सलग दोनदा शून्यावर बाद झालेला, कोचला सांगून पुढच्या सामन्यात टप्प्यात कार्यक्रम केलेला, किंग कोहलीचा किस्सा चर्चेत


Virat Kohli News : सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या तयारीवर आत्मविश्वास ठेवला. माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्यामागचा एक खास किस्सा उलगडला आहे.

Virat Kohli News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानलं जातं. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्याने स्वतःची तयारी आणि खेळाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे खराब फॉर्म असो किंवा दीर्घ विश्रांतीनंतरचे पुनरागमन, कोहली क्वचितच आपल्या खेळापासून दूर राहतो. भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी विराटच्या याच आत्मविश्वासाचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांच्या मते, कठीण काळातही कोहली स्वतःच्या क्षमतेवर अढळ विश्वास करतो.

दोन शून्यांनंतर सल्ला नाकारला

अभिषेक नायर यांनी ‘गुगलीज’ या कार्यक्रमात सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी त्यांनी विराटला सर्व काही ठीक आहे का आणि काही चर्चा करायची आहे का, असे विचारले. मात्र कोहलीने शांतपणे, “सगळं ठीक आहे. हा खेळाचा भाग आहे,” असे उत्तर दिले. नंतर नायर यांनी काही निरीक्षण सांगण्याची इच्छा व्यक्त केली, पण विराटने हसतच, “मी माझ्या पद्धतीने यातून बाहेर पडेन, मी पाहून घेतो” असे सांगत सल्ला घेण्यास नकार दिला.

Maharashtra TimesWashington Freedom vs MI New York : 267 धावांचं लक्ष्य 18.4 षटकांत पार; मुंबई इंडियन्सच्या संघाला विरोधी टीमनं पछाडलं, कॅप्टनचं 33 चेंडूतलं शतक वाया

पुढच्याच सामन्यात दिलं उत्तर

नायर यांच्या मते, विराटने केवळ बोलूनच नाही तर कृतीतूनही स्वतःवरील विश्वास सिद्ध केला. पुढील सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 74 धावांची खेळी करत दमदार पुनरागमन केले. नायर म्हणाले, महान खेळाडू कठीण परिस्थितीत नेमकं काय करायचं हे जाणतात. म्हणूनच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याविषयी त्यांच्या मनात विशेष आदर आहे.

रोहित-विराट संघाला देतील आत्मविश्वास

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराटने 5, तर रोहित शर्माने 11 धावा केल्या. दोघेही मोठी खेळी करू शकले नसले तरी भारताने सामना सहा विकेट्सने जिंकला. नायर यांच्या मते, रोहित आणि विराट यांचा अनुभव भारतीय संघासाठी मोठी ताकद आहे. त्यांची उपस्थिती ड्रेसिंग रूममधला आत्मविश्वास वाढवते आणि उर्वरित खेळाडूंवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उर्वरित वनडे सामन्यांत दोघेही मोठी खेळी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.