![]()
मित्र कधीच खूप जास्त नसतात. थोडेफार असतात. तेही दोन प्रकारचे—अंतरंग आणि बहिरंग. मैत्रीत समानता, संयम व संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मित्र जोडण्याची इच्छा असेल आणि मैत्रीच्या बाबतीत एकटेपणा जाणवत असेल तर एक प्रयोग करून पाहा. आपल्या नातेसंबंधांतून मैत्री शोधा. त्यामुळे ते किमान ओळखीचे व पारखलेले असतील. हा प्रयोग अर्जुन व श्रीकृष्ण यांनी केला होता. ते दोघे रक्ताच्या नात्याने जोडलेले होते. त्यांनी त्या नात्याचे मैत्रीत रूपांतर केले. त्यांची मैत्री इतकी सुंदर होती की, अनेक प्रसंगी अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरू असेही संबोधले. ते योग्यच होते. मित्र कधी गुरूच्या भूमिकेत येईल. हे सांगता येत नाही. वेळ आल्यावर शिष्यही बनतो तोच खरा मित्र असतो. स्वतः गुरूची भूमिकाही निभावतो. मित्र हे पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखे नसतात. डाव जिंकण्यासाठी हवे तसे वापरले. मित्र हे एखाद्या ग्रंथाच्या पानांसारखे असतात. ग्रंथ बंद असला तरी त्याचे महत्त्व कायम असते. त्यातील प्रत्येक चांगला विचार आयुष्यात उपयोगी पडतो.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नात्याचे मैत्रीत रूपांतर करायचे तर श्रीकृष्ण -अर्जुनांकडून शिका
