Headlines

नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?| Maharashtra Times


Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, कारण प्रशासनाकडून या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर!

म.टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मृत्यूमुखी पडणाऱ्या मोकाट प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नाही. मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह अनेक दिवस विद्रूप अवस्थेत रस्त्यावरच पडून राहतात. या मृतदेहांवरून अनेक वाहने सुसाट धावत असतात. मृतदेहांवरुन वाहने जाताना अपघाताची सतत भीती असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नवीन बायपासवर वाहनांचा वेग ताशी १०० कि.मी. आहे. या मार्गावर कोणताही प्राणी येऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. असे असूनही, कुत्रे, मांजरी, माकडे व अन्य पाळीव प्राणी महामार्गावर पोहोचतात. रात्रीच्या वेळी अपघातात हे प्राणी अनेकदा मृत्यूमुखी पडतात. प्राणी वन्यजीव असेल तर वन विभागाच्या पथकाला कळविले जाते आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. पण जर ते पाळीव प्राणी असतील तर ते तिथेच पडलेले असतात.
Maharashtra TimesBhandara Crime : ‘तू आईशी का भांडतोस’; दारुच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाला मित्राच्या मदतीने मारहाण, घरासमोरच हत्या
भिलेवाडा येथील वन तपासणी नाक्यासमोरील सर्व्हिस रोडवर वाहनाने धडक दिल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत कुत्र्याचा मृतदेह बाहेर काढला जाण्याची अपेक्षा होती. परंतु कुत्र्याचा मृतदेह कुजला. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. मृतदेहावर पाणी पडल्याने आणि त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे आजूबाजूला घाण पसरली. परंतु तो काढण्यात आला नाही. त्याचप्रमाणे, भिलवाडा टेकडीच्या जवळ साकोली-नागपूर बायपास रस्त्यावर वाहनाने धडक दिल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. शेकडो वाहने मृतदेहावरून गेली आणि मांसाचे तुकडे इकडे तिकडे विखुरले. परंतु संबंधित प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मृत प्राण्याच्या संपर्कात लहान वाहने येण्याचा धोका सतत असतो. त्यामुळे अनेकदा अपघाताची शक्यता असते.

मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर!

रस्त्यावर गस्त नाही

भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर पेट्रोलिंगची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत नियमांबाहेर पार्क केलेल्या वाहनांशी टक्कर होऊन अपघात होतात. काही आठवड्यापूर्वी पार्क केलेल्या वाहनांशी टक्कर होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. पेट्रोलिंग टीम पार्क केलेली वाहने काढून टाकण्याची, तांत्रिक कारणांमुळे बिघाड झालेल्या वाहनांभोवती रिफ्लेक्टर लावण्याची आणि क्रेन मागवण्याची व्यवस्था करते. परंतु येथे पेट्रोलिंग टीमचा अभाव असल्याचे दिसून येते.