Headlines

जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, शेतकरी आक्रमक! – farmers are aggressive not a single rupee will be deposited in the bank until the government waives off loans



Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या केलसुरा गावात शेतकऱ्यांनी…ठाम भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. सोलापूर बँक ऑफ इंडिया शाखेचे…अधिकारी पिककर्जाची वसुली करण्यासाठी गावात आले असता, ग्रामपंचायत कार्यालयात…ग्रामसभा बोलावून शेतकऱ्यांनी त्यांना थेट जाब विचारला. जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही…तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला. या आंदोलनात गावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. शेतकरी संकटात असताना वसुलीचा तगादा लावू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत