Headlines

‘ईठा’त मूळ इतिहासाची मोडतोड, ‘भाऊ गावकर तमाशा मंडळ’ असा चुकीचा उल्लेख, विठाबाईंच्या नातवाचा आक्षेप,कायदेशीर कारवाईचा इशारा


बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटावर त्यांच्याच कुटुंबीयांनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातून गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.

Eetha Controversy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ या आगामी चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये इतिहासाची मोडतोड करून चुकीची माहिती दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांचे नातू आणि राज्य सरकारच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

Maharashtra TimesAmruta Raorane : MPSC आणि UPSC ची तयारी सुरू केली, पण एका मालिकेनं सगळंच बदललं; मराठी मालिकेतील अभिनेत्रीचा खुलासा
विठाबाई नारायणगावकर यांनी महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. मात्र, त्यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी संपूर्ण कुटुंबीयांची परवानगी घेतलेली नाही. चित्रपटाच्या टीझरमध्ये ‘भाऊ गावकर तमाशा मंडळ’ असा चुकीचा उल्लेख करण्यात आला असून, प्रत्यक्षात त्याचे नाव ‘भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ’ असे होते. बापूसाहेब खुडे नारायणगावकर यांना १९६१मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये हा प्रसंगही वस्तुस्थितीशी विसंगत आहे.
Maharashtra TimesZee Marathi serial: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अनुष्का पिंपुटकरची एन्ट्री, म्हणाली ‘मेघनसोबतही आता जास्त वेळ घालवता येतोय’
‘चित्रपटाचे नावही बदलण्याची आवश्यकता आहे. लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि तमाशा या लोककलेबाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी चित्रपटात आवश्यक बदल करावेत; अन्यथा चित्रपट निर्माते व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई व आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कायदेशीर कारवाईचा इशारा
विठाबाईंच्या संघर्षाची आणि लोककलेची चुकीची माहिती लोकांसमोर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. जर चित्रपट निर्मात्यांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि अब्रूनुकसानीचा दावा ठोकू, असा थेट इशारा विठाबाईंच्या नातवांनी दिला आहे. तसेच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.

हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, वाढत्या विरोधामुळे आता निर्माते यावर काय पाऊल उचलतात आणि शीर्षकात बदल करतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
मराठी मातीतली अस्सल लोककला ‘तमाशा’ आणि ‘लावणी’ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या महान कलावंत म्हणजे विठाबाई नारायणगावकर.विठाबाईंचा जन्म १ जुलै १९३५ रोजी पंढरपूर येथील एका प्रसिद्ध कलावंत कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी पारंपरिक तमाशा फड सुरू केला होता. पुढे त्यांचे वडील भाऊ आणि काका बापू यांनी ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर’ या नावाने हा फड चालवला. घरातच ढोलकीचा ताल आणि लावणीचे सूर असल्याने विठाबाईंच्या अंगात उपजतच कला होती. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी अत्यंत लहान वयात त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि अल्पावधीतच आपल्या नृत्याने व आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा