Amruta Sakpal Raorane on Career struggle and MPSC UPSC class: मराठी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री अमृता रावराणे सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं करिअरमधील संघर्षावर भाष्य केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सिनेइंडस्ट्रीतल्या संघर्षाबद्दल अनेक कलाकार व्यक्त होत असतात. अनेकदा एकामागे एक मिळत जातं, पण प्रत्येत कलाकाराच्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा त्याच्याकडे काम नसतं. एखादं प्रोजेक्ट संपलं की, दुसरं मिळेपर्यंतचा काळ हा कठीण असतो. आता मराठी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री अमृता रावराणे हिनं देखील करिअरमधली संघर्षावर भाष्य केलंय.
करिअरच्या सुरुवातीला नाटक,मालिकांमध्ये काम केलं. पण नंतर असाही काळ आला जेव्हा अमृताकडे काम नव्हतं. या मोकळ्या वेळात तिनं स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरू केला होता, मात्र नंतर एका मालिकेत निवड झाली अन् सगळंच बदललं, असं ती सांगते.
काय म्हटलं अमृता रावराणे हिनं? तर असाही एक काळ होता जेव्हा मी एक दीड महिना घरी होते. २०१२ची ही गोष्ट आहे. या एक दीड महिन्यात कोणतंच काम नव्हतं. ना नाटक ,ना मालिका. त्यामुळे या काळात काय करावं? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे मी या काळात अभ्याकडे वळले. युपीएससी, एमपीएससीच्या परिक्षांचा अ्भ्यास सुरू केला. ठाण्यात एक क्लास होता. त्यांची एक पॉलिसी होती की, सुरुवातील १५ दिवस यायचं अभ्यासाला, आवडलं तरच पुढची फी भरायची. त्यामुळे मी पंधरा दिवस या क्लासला गेले होते. मलाही अभ्यासाठी आवड लागली होती. याच दरम्यान, रसिका नामजोशीचा फोन आला. त्यांनी विचारलं की, काय करतेस सध्या? त्यावर मी अभ्यास आणि क्लास लावल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी मालिकेच्या ऑडिशनबद्दल सांगितलं. मी त्या ऑडिशनले गेले आणि माझी निवडही झाली. ही माझं आयुष्य बदलणारी मालिका होती,असं अमृतानं सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
या मालिकेत काम करत असतानाच याच क्षेत्रात काम करायचं, असा निर्णय पक्का केला, असंही तिनं सांगितलं.माझे मन तुझे या मालिकेनं मला ओळख मिळवून दिली. यातील स्वामिनी भूमिका साकारायला मलाही आवडायचं, असंही ती म्हणाली.
Ajinkya Raut Interview : मी गौतम बुद्धांच्या भूमिकेत, अभिनेता अजिंक्य राऊतला पडायचं स्वप्न
अमृताच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.’माझिया प्रियाला प्रीत कळेना‘ या लोकप्रिय मालिकेत तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसंच, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील तिच्या पात्रालाही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे यांच्याची या मालिकेत भूमिका होत्या. सध्या अमृता स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा