शरद पवार यांना आंदोलनापासून वेगळं ठेवा तरच आंदोलन यशस्वी होईल, असं विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच प्रकाश आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रधान यांचा राजीनामा घेण्याची पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात हिंमत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.