Headlines

तुकाराम मुंडे इफेक्ट! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्येही FDA ची एन्ट्री, माधवी आत्माराम भीडेला धक्का


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo:काही टीव्ही मालिका अशा असतात, ज्या केवळ मनोरंजनाचं साधन न राहता कुटुंबातील एक भाग बनतात. असित कुमार मोदी निर्मित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका याचं एक उदाहरण. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा संदर्भ या मालिकेत पाहायला मिळतो.

TMKOC FDA Promo
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तुकाराम मुंडे हे नाव गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. सरकारी अधिकारी असलेले मुंडे हे ज्या विभागात जातात तिथं त्यांच्या कार्याची छाप पडते. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांनी धडक कारवाई सुरू केली. त्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. अन्नपुरवठ्यातील भेसळ रोखण्यात मदत होत आहे. आजवर जे कुणाला जमलं नाही ते मुंडे करीत आहेत, अशा प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल म्हणा किंवा धसका आता सगळ्यांनीच घेतला आहे. हॉटेल क्षेत्रासोबतच आता टीव्ही मालिकेतही अन्नपुरवठ्यातील भेसळ रोखण्याच्या दृष्टीनं काही सीन लिहिले जात आहेत. आता लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतही असंच काहीसं कथानक पाहायला मिळणार आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत एफडीएची एन्ट्री

तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत माधवी भीडे ही घरगुती लोणचं आणि पापड विक्रीचा व्यवसाय करत असते. मालिका सुरू झाली तेव्हापासून माधवीच्या या व्यवसायात येणारे अडथळे, अडचणी अनेकदा दाखवण्यात आल्या आहेत. आता तिच्या या व्यवसायात अन्न व औषधी प्रशासन विभागाची एन्ट्री झाल्याचं एका प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.

प्रोमोत पाहायला मिळतं की, आत्माराम आणि माधवी भीडे यांच्या घरी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे म्हणजेच एफडीएचे अधिकारी आलेले आहेत. ते सांगतात की, तुमच्या लिंबू मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा सापडला आहे. त्यामुळं तुमचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आमच्या कार्यालयात येऊ सांगा…यानंतर माधवी आणि गोकुळधाम सोसायटीचा एकमेव अध्यक्ष आत्माराम भीडे आणि माधवी भीडे यांना चांगलाच धक्का बसतो…असा हा प्रोमो ,सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Maharashtra TimesMarathi Child Actor: अतुल परचुरेंसोबत नाटकात काम, फोटोतल्या या बालकलाकाराला ओळखलं का? आता आहे सोशल मीडिया स्टार, बहीण देखील आहे अभिनेत्री

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

तर एकानं लिहिलं की, मुंडे साहेब इथे पण पोहोचले का? . तर दुसऱ्यानं लिहिलं की,तुकाराम मुंडे इफेक्ट…अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी सध्या सुरू असलेल्या बातम्या लक्षात घेता माधवी हे स्वप्नात पाहत असेल, असा अंदाजही काही नेटकऱ्यांनी लावला आहे.

मालिकेतलं मराठमोळं जोडपं

तर टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालणाऱ्या आणि घराघरांत लोकप्रिय ठरलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. मात्र, या सगळ्यात गोकुळधाम सोसायटीचे “एकमेव सेक्रेटरी” आत्माराम तुकाराम भिडे आणि त्यांची सहधर्मचारीणी माधवी भिडे यांची जोडी मराठी प्रेक्षकांसाठी विशेष आणि आपुलकीची वाटते. मालिकेत अभिनेता मंदार चांदवडकर यांनी आत्माराम तुकाराम भिडे ही शिस्तप्रिय शिक्षक आणि सेक्रेटरीची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री सोनालिका जोशी यांनी माधवी भिडे या गृहिणी व व्यवसायनिपुण स्त्रीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावर छापेसत्र सुरू

अन्न व औषध प्रशासनाच्या आय़ुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर राज्यभरातील औषध कंपन्यांसह हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यावर छापेसत्र सुरू झाले. त्यातून सामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे, या हेतूनं मुंढे यांच्या कारवाईनं राज्यातील हॉटेल चालकांपासून ते दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांचे; तसंच औषध कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याशिवाय आता छोट्या मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग पुण्यासह विभागातील सातारा जिल्ह्यात ‘एफडीए’च्या अन्न विभागानं कारवाई सुरू केली आहे.

Maharashtra TimesChhaya Kadam Interview: खासगी आयुष्य प्रकाशझोतापासून दूर ठेवायचंय, मोठ्या रिॲलिटी शोला दिलेला नकार; स्पष्टच बोलल्या छाया कदम
कारवाई दरम्यान, तीन लाख ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधित पाच जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राहकांना अन्न पदार्थाचा दर्जा अथवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर १८००२२२३६५ नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा