Headlines

गोंदियात कॉंग्रेस राखणार गड? सर्वाधिक ११ आमदार काँग्रेसचेच, शिवसेना दोनदा तर एकदा अपक्षाची बाजी – maharashtra vidhan sabha nivadnuk gondia constituency most 11 mlas belong to congress


Gondia Vidhan Sabha: काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा तर एकदा अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपने विद्यमान अपक्ष आमदारांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविला आहे.

congress flag
congress flag(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
खेमेंद्र कटरे, गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आजवर १४ विधानसभा निवडणुका झाल्या. यात काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा तर एकदा अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजप ने विद्यमान अपक्ष आमदारांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविला आहे. या लढतीत काँग्रेस आपला गड परत मिळविणार की भाजप विजयाच्या यादीत आपले नाव नोंदविणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात विधानसभेची पहिली निवडणूक १९६२मध्ये घेण्यात आली. १९६२-९९०पर्यंत गोंदिया विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचे वर्चस्व होते. यानंतर १९९५ आणि १९९९च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यास विरोधकांना यश आले. युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे रमेश कुथे यांनी दोनदा या मतदारसंघातून विजय मिळविला. यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व स्थापन केले. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर विनोद अग्रवाल यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत विजयही मिळविला. या निवडणुकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपकडून तर माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी घरवापसी करीत काँग्रेसमधून उमेदवारी मिळविली आहे. दोन उमेदवार खुल्या गटातील असल्याने या मतदारसंघातील ओबीसी समाज कुणाच्या बाजूने वळणार यावर या मतदारसंघातील निवडणुकीचे गणित ठरणार आहे.
Maharashtra Timesबड्या नेत्यांचे ‘मिशन विदर्भ’! मोदी, गांधी, ठाकरे, पवार घेणार सभा; कुणाची कधी होणार सभा?
बाजपेयी कुटुंबाकडे २३ वर्षे सत्ता
गोंदिया विधानसभा मतदारसंघात १९६७पासून जनसंघ, जनता पार्टी आणि आताचे भाजप काँग्रेसला आव्हान देत आहे. मात्र आजवर या मतदारसंघात कधीही भाजपला यश मिळाले नाही. या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून मनोहरभाई पटेल विजयी झाले होते. त्यांनी प्रज्ञा समाजवादी पार्टीचे गोपाल नारायण बाजपेयी यांच्यावर विजय मिळविला होता. यानंतरच्या दोन निवडणुका गोपाल नारायण बाजपेयी यांनी काँग्रेसच्यावतीने लढवून विजय मिळविला. १९७८च्या निवडणुकीत राजकुमारी बाजपेयी यांनी निवडणूक लढवली. सलग तीनदा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. एकंदरीत बाजपेयी कुटुंबाकडे सर्वाधिक २३ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व राहिले आहे.

दोन आमदारांची हॅट्‌ट्रिक
गोंदिया विधानसभा मतदारसंघ अस्त्विात आल्यानंतर या मतदारसंघावर सर्वाधिक काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत दोन आमदारांनी या मतदारसंघातून तीनदा निवडून येत विजयाची हॅट्‌ट्रिक केली आहे. यात राजकुमारी बाजपेयी यांनी १९७८ ते १९८५पर्यंतच्या निवडणुकीत सलग विजय मिळविला. गोपालदास अग्रवाल यांनी २००४-१४पर्यंतच्या निवडणुकीत सलग विजय प्राप्त करीत हॅट्‌ट्रिक केली होती.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा