Harbhajan Singh News : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केलेले विधान चर्चेत आले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते, असं भज्जीचं म्हणणं आहे. नेमकं काय ते जाणून घ्या.

वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टवरील मुलाखतीत हरभजनने आपली मते व्यक्त केली. टी-२० लीगचे वाढते आयोजन पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या भवितव्याबाबत त्याने मोकळेपणाने मत मांडले. व्यावसायिक लीगचा प्रेक्षकवर्ग वाढत असला, तरी या स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लोकप्रियतेवर मात करतील का, या प्रश्नावर हरभजन म्हणाला, ‘करतील का? हे घडले आहे. सुमारे ७० टक्के लोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी व्यावसायिक लीग पाहत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांना पुरेशा संख्येने प्रेक्षक मिळतात. मात्र, भारत-श्रीलंका किंवा भारत-अफगाणिस्तान सामन्यांना अल्प प्रतिसाद मिळतो.’ ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील लढतींनाही चांगली प्रेक्षकसंख्या मिळते, असे हरभजनसिंगचे म्हणणे आहे.
IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्या
इंग्लंडमधील ‘दी हंड्रेड’ असो किंवा ऑस्ट्रेलियातील ‘बीबीएल’ या व्यावसायिक लीगसाठी स्टेडियम हाउसफुल्ल होतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मात्र मागे पडले असल्याचं हरभजनसिंगने म्हटलं आहे. एकंदरित त्याच्या म्हणण्यानुसार लीगमुळेच आंतरराष्ट्रीय मालिकांच्या प्रेक्षक क्षमतेवर परिणाम होत चालला आहे. कारण चाहते आता ज्या संख्येने आयपीएल आणि इतर लीगच्या सामन्यांना हजेरी लावत आहेत त्यातुलनेत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसत नाही. याचा पार्श्वभूमीवर बोलताना हरभजन सिंगने हे विधान केले आहे.
कसोटी क्रिकेटबाबत हरभजनची मते
कसोटी क्रिकेट म्हणजे कौशल्य आणि जिद्दीची खरी परीक्षा आहे. क्रिकेटचा हा प्रकार कायमच सर्वोच्च स्थानी असायला हवा. कसोटी हेच खरे क्रिकेट, त्याला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं हसभजन म्हणाला. कारण कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असल्याने प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. कारण झटपट क्रिकेट म्हणजे टी-२० सामने आणि लीगचा फॉरमॅटही तसाच काहीसा आहे. द हंड्रेड, आयपीएल, बीबीएलमुळे चाहत्यांना आता कसोटी क्रिकेट रटाळ वाटू लागले आहे.
Shreyanka Patil : टीम इंडियाची स्टार खेळाडू श्रेयंका पाटीलचा ‘बबली बदमाश’ गाण्यावरचा Video तुफान व्हायरल
टी-२० लीग मोठ्या झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जुनी प्रतिष्ठा परत मिळवणे कठीण झाले आहे. या लीगमुळे फलंदाजांची मानसिकता आणि प्रेक्षकांची विचारसरणी बदलली आहे. वेळेची कमतरता असल्याने टी-२० क्रिकेट अधिक लोकप्रिय होत असल्याचं हरभजसिंग याने सांगितलं.
Rohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?
दरम्यान, आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये तो उत्साह राहण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू केली आहे. दोन वर्षांनी या विजेतेपदासाठी दोन संघ खेळतात. अंतिम सामन्यासाठी ज्या मालिका होतात त्यांच्या गुणांवर पॉइंट टेबलमध्ये चढाओढ दिसते. किमान त्यामुळे खेळाडू संपूर्ण ताकदीने मैदनात प्रदर्शन करतात.

