Rohit Sharma News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत रोहित शर्माची बॅट शांत राहिल्यानंतर निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहितच्या फलंदाजीबाबत भाष्य केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहित शर्माला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही अहवालांमध्ये लॉर्ड्सवरील तिसरा वनडे हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, असा दावाही करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, दुसऱ्या वनडेनंतर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहितच्या फॉर्मबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले.
‘रोहितसारख्या खेळाडूवर दबाव असू शकत नाही’
कार्डिफ वनडेनंतर पत्रकार परिषदेत रोहितच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सितांशू कोटक म्हणाले, “रोहितसारख्या अनुभवी आणि मोठ्या खेळाडूवर दबाव असू शकत नाही. पहिल्या दोन सामन्यांत त्याला धावा करता आल्या नाहीत, पण त्यामुळे तो संघर्ष करतोय, असा निष्कर्ष काढता येणार नाही. मी खूप क्रिकेट खेळलो आणि पाहिलं आहे. अनेकदा फलंदाजांना सुरुवातीला अपेक्षित लय मिळत नाही. त्यावरून त्यांची गुणवत्ता ठरवता येत नाही.”
कोटक यांनी पुढे सांगितले की, कार्डिफमधील खेळपट्टीवर चेंडूला दुहेरी उसळी मिळत होती. त्यामुळे फलंदाजांना फटके खेळताना अडचणी आल्या आणि त्याचाही परिणाम भारतीय फलंदाजीवर दिसून आला.
दरम्यान, 2027 च्या वनडे विश्वचषकाची तयारी लक्षात घेऊन भारतीय संघ भविष्यातील नियोजन करत असल्याची चर्चा आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, निवड समितीने रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकाच्या योजनांचा भाग नसल्याचे संकेत दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे हा रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रोहितचे आई-वडिलही हा सामना पाहण्यासाठी इंग्लंडला पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र बीसीसीआय किंवा स्वतः रोहित शर्मा यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात असले, तरी अधिकृत निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेनंतरच या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष रोहितच्या कामगिरीसोबतच बीसीसीआयच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा