वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करताना घाबरण्याऐवजी योग्य तयारी आणि सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येक सदस्याने सुरक्षिततेचे नियम पाळल्यास अनेक संभाव्य धोके टाळता येतात. हवामान सामान्य होईपर्यंत अधिकृत सूचनांचे पालन करा, अनावश्यक प्रवास टाळा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

अशा प्रतिकूल हवामानात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान आणखी बिघडण्याची शक्यता असल्यास आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, कोरडे अन्न, मोबाईल चार्जर, पॉवर बँक, टॉर्च आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची आधीच व्यवस्था करून ठेवावी.
वादळी वाऱ्यांमुळे घराच्या खिडक्या, दरवाजे आणि बाल्कनीत ठेवलेल्या वस्तू धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे घरातील सर्व खिडक्या व्यवस्थित बंद आहेत का, बाल्कनीतील हलक्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत का आणि विजेच्या उपकरणांचा सुरक्षित वापर होत आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मौल्यवान वस्तू उंच ठिकाणी ठेवाव्यात. (फोटो सौजन्य :- @iStock, Maharashtra Times)
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवा
मुले खिडकीजवळ किंवा बाल्कनीत जाऊ नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक औषधे वेळेवर मिळतील आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल याची खात्री करा.
आपत्कालीन क्रमांक जवळ ठेवा
महापालिका, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे हेल्पलाइन क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. गरज पडल्यास त्वरित संपर्क साधता येईल.
आपत्कालीन क्रमांक महाराष्ट्र
112 — एकत्रित आपत्कालीन क्रमांक (पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायर)
पोलीस
100 — पोलीस हेल्पलाइन
रुग्णवाहिका (Ambulance)
108 — अॅम्ब्युलन्स सेवा
102 — वैद्यकीय/मातृत्व रुग्णवाहिका
अग्निशमन दल
101 — फायर ब्रिगेड
महिलांसाठी मदत
181 — महिला हेल्पलाइन
1091 — महिला संकट हेल्पलाइन
अफवांवर विश्वास ठेवू नका
सोशल मीडियावर येणारे प्रत्येक संदेश खरे असतीलच असे नाही. हवामान, पाऊस किंवा आपत्कालीन परिस्थितीबाबतची माहिती अधिकृत शासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडूनच तपासा.
आवश्यक वस्तूंचा साठा ठेवा
पिण्याचे पाणी, कोरडे अन्न, बिस्किटे, औषधे, बाळांचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू घरात उपलब्ध ठेवा. हवामान खराब असल्यास बाहेर जाण्याची वेळ येऊ नये यासाठी ही तयारी उपयुक्त ठरते.
बाल्कनीतील वस्तू आत ठेवा
फुलांची कुंडी, प्लास्टिकच्या खुर्च्या, कपडे वाळत घालण्याचे स्टँड, सजावटीच्या वस्तू किंवा इतर हलक्या वस्तू बाल्कनीत ठेवू नका. जोरदार वाऱ्यामुळे या वस्तू उडून अपघात होऊ शकतो.

