Headlines

महापौरांनी खडसावलं अन् आक्रमक नगरसेवक शांत, पालिकेची सभा पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी झाले अवाक


महापालिकेची सभा पाहण्यासाठी एका शाळेचे विद्यार्थी आले होते. यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज पाहताना विद्यार्थी अवाक झाले.

chhatrapati sambhajinagar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी मंगळवारी एका शाळेचे विद्यार्थी आले होते. सभागृहात सदस्यांकडून विचारले जाणारे प्रश्न, गोंधळ पाहून विद्यार्थी अवाक झाले. एरव्ही दूरचित्रवाणी, सोशल मीडियावरून पाहणारी गडबड लाइव्ह पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते. महापौर समीर राजूरकर यांनी विद्यार्थी सभागृहाचे कामकाज पाहत आहेत, जरा भान ठेवा असे सांगितल्यानंतर काही काळासाठी नगरसेवक मंडळी शांत झाली.

हर्सूल येथील कॉलेजचे विद्यार्थी सभा पाहण्यासाठी आले

हर्सूल येथील संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सर्वसाधारण सभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत आले होते. महापौरांची शाळेने रितसर परवानगी घेतली होती.

विद्यार्थ्यांनी पालिकेच्या सभेचा घेतला लाईव्ह अनुभव

आपले नगरसेवक कोणते प्रश्न कसे मांडतात ? कोणत्या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करतात ? एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप कसे करतात? एखाद्या विषयाची माहितीच नसताना बळेच विषय कसा रेटून नेतात? अशा अनेक गंमतीजंमती विद्यार्थ्यांनी लाइव्ह अनुभवल्या.

महापौरांसमोर गोंधळ

या विद्यार्थ्यांनी यापूर्वी दिल्लीत संसदेचे कामकाजही पाहिले असल्याचे शिक्षकांनी सांगितले. एका विषयावरून सुरू झालेल्या चर्चेचे पाहता पाहता वादात रुपांतर झाले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौरांच्या डायससमोरील जागेत विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जमा झाले. हा गोंधळ पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून गेले.

महापौरांनी खडसावल्यानंतर गोंधळ शांत

दिल्ली ते गल्ली लोकशाहीची कार्यपद्धती कशी चालते याचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापेक्षा आपला वर्ग किती शिस्तीचा असतो अशी चर्चा आपापसात सुरू केली. दरम्यान, सभागृहातील गोंधळ वाढत असताना महापौरांनी प्रेक्षक गॅलरीकडे नगरसेवकांचे लक्ष वेधले. शाळेची मुले आपली सभा पाहण्यासाठी आले आहेत. संयम राखा असे महापौर राजूरकरांनी म्हटल्यानंतर गोंधळ शांत झाला.

chhatrapati sambhajinagar

ऑन ड्यूटी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेचे धनादेश प्रदान

दरम्यान, महापालिकेच्या सेवेत कायम कर्मचारी म्हणून कार्यरत असताना नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू झालेल्या अनुक्रमे २१ आणि दोन अशा २३ जणांच्या वारसांना मंगळवारी सर्वसाधारण सभेत विम्याच्या रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळे, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्ष नेते समीर साजीद व गटनेत्यांच्या उपस्थितीत हे धनादेश प्रदान करण्यात आले.

महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याबाबत युनियन बँकेसोबत करार आहे. त्याअंतर्गत बँकेने कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. कामावर असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना आहे. अपघाती मृत्यू झालेले रामदास बमणे आणि अमोल जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक – एक कोटी रुपयांचा तर नैसर्गिक मृत्यू झालेल्या २३ पैकी २० कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये, विपीन दसरे यांच्या वारसांना दहा लाखांचा धनादेश देण्यात आला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा