मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी गावात जावून जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण सरकारच्या शिष्टमंडळाला त्यामध्ये यश आलं नाही. जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्टला पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी जालनाच्या अंतरवली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ आलं. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. मात्र, या चर्चेनंतरही 29 ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन थांबणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि मंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह नोंदी, प्रमाणपत्रे, दाखल गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान बलिदान झालेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत चर्चा झाली.
विखे पाटील काय म्हणाले?
या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांचा समाजासाठी लढा असून, शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने त्यांची नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंमलबजावणीतील त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आंदोलनाबाबत जरांगे पाटील यांनी फेरविचार करावा, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील काय म्हणाले?
शिंदे समितीने दिलेल्या 58 लाख नोंदींच्या आकडेवारीचा मुद्दाही चर्चेत आला. या नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजबांधवांना प्रमाणपत्रे देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठामपणे मांडली. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे प्रमाणपत्र द्या आणि जे काही करायचे आहे ते 29 ऑगस्टपूर्वी करा, असे आपण सरकारला स्पष्ट सांगितल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
सरकारच्या शिष्टमंडळासोबत सातारा GR संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी, त्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी, मराठा आंदोलनादरम्यान राज्यभर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे तसेच आंदोलनात बलिदान झालेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना निधी देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी सरकारसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. शासनाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांचं मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन
सरकारकडून होणाऱ्या चर्चेपेक्षा 28 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या मराठा समाजबांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यावे, असे त्यांनी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील त्यांनीही अंतरवालीत यावे, असे ते म्हणाले.
29 ऑगस्टचे आंदोलन थांबणार नाही. हे माझे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन आहे, असे सांगत जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजबांधवांना खडबडून जागे होऊन घराबाहेर पडण्याचे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा