आशिष इझनकर, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा संसार अक्षरशः राखेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पतीने स्वतःच्या घराला पेटवून दिल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले, तर घराबाहेर उभे असलेले दुचाकी वाहनही जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही घटना वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आंजी मोठी गावात गुरुवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन ठाकरे असे संबंधित व्यक्तीचे नाव असून तो रोजंदारीवर काम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. हे व्यसन वाढताच घरातील वातावरण तापू लागले होते आणि पती, पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.
अखेर पत्नीने सततच्या भांडणाला कंटाळून घर सोडले, आणि त्यामुळे गजानन ठाकरेवर मानसिक तणाव आला. पत्नी निघून गेल्यानंतर तो अधिकच मद्यधुंद राहू लागला. दारूचे अतिसेवन केले आणि रागाच्या भरात त्याने आपल्या राहत्या घरालाच आग लावली. काही क्षणांतच आग भडकली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले.
घरातील कपडे, धान्य, वीज साहित्य, फर्निचर, भांडी, तसेच घरासमोर उभे असलेले दुचाकी वाहनही पूर्णतः जळून राख झाले. आग एवढी भीषन होती की ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांनी मिळून पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातील सर्व साहित्य भस्मसात झाल्यानंतरच आग नियंत्रणात आली.
गौतमी पाटीलच्या आरोपांना मरगळे कुटुंबियांचे उत्तर, काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच आंजी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सानप, तसेच हवालदार दिनेश धवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद खरांगणा पोलीस ठाण्यात केली. ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा