Headlines

नागपूर महानगरपालिकेची २०० अवैध बांधकामांना नोटीस; महापौर नीता ठाकरे यांचे कठोर कारवाईचे निर्देश


Nagpur News: मनपाच्या दहाही झोन कार्यालयांनी बेकायदेशीर बांधकामांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये नेहरूनगर झोनमध्ये सर्वाधिक ८५ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याखालोखाल लकडगंज झोनमध्ये ४३, धरमपेठ आणि धंतोली झोनमध्ये प्रत्येकी १८, सतरंजीपुरा ११, लक्ष्मीनगर दहा, मंगळवारी नऊ, हनुमाननगर चार आणि आशीनगर झोनमध्ये दोन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकूण २०० बांधकामांना नोटीस देण्यात आल्या आहेत. मनपाच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामे आणि अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

नागपूर महानगर पालिका
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर :शहरातील अवैध बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात नागपूर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. दहाही झोनमधील २०० बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये मॉल, रुग्णालये, सेलिब्रेशन हॉल तसेच विविध व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. अवैध बांधकाम करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल, अशी ठोस कारवाई करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

अवैध बांधकाम करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक

अवैध बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापौर ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेतली. शहराचे स्वरूप बदलण्यासाठी बेकायदेशीर बांधकामे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. केवळ थातूरमातूर कारवाई न करता अवैध बांधकाम करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक बसला पाहिजे आणि त्याची प्रचिती नागरिकांना दिसली पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संयुक्तपणे कारवाई केल्यास अधिक प्रभावी ठरेल

कारवाईसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास संबंधित सहायक आयुक्तांनी प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. नगररचना विभाग, पोलिस, अग्निशमन दल आणि अतिक्रमण हटाव विभागाने संयुक्तपणे कारवाई केल्यास ती अधिक प्रभावी ठरेल, असे त्यांनी सांगितले. अतिक्रमण विभागातील मनुष्यबळ वाढविण्याची गरज असल्याचेही महापौरांनी नमूद केले.

Maharashtra TimesAmravati Chikhaldara News: भूताटकीच्या अफवेनंतर ‘डोमा’तील मुलींसाठी २८८ बेडचे नवे वसतिगृह ; घरी गेलेल्या मुलींच्या परतीची आशा

महापौरांचे प्रशासनाला निर्देश

अतिक्रमण आणि अवैध बांधकामांवरील कारवाईसाठी मनपाकडे पुरेसे मनुष्यबळउपलब्ध नसल्याने नागरी पोलिसांची भरती तसेच प्रतिनियुक्तीवर तहसीलदारांची नियुक्ती करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौरांनी तुकडोजी पुतळा परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

रस्त्यावर नारळपाणी विक्रीसह इतर अतिक्रमणांवरही कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून गोदामांची बांधकामे करण्यात आली असून, त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे महापौरांनी सांगितले. मोठे खांब उभारल्यानेही नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात नसरापूरची पुनरावृत्ती! 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, नंतर जीव घेऊन बॉडी फेकली, आमदार शरद सोनवणेंच्या गावातच संतापजनक कृत्य

बांधकामांना नव्या डीपीआरमध्ये व्यावसायिक क्षेत्र म्हणून मंजुरी नाही

अशा अवैध बांधकामांना नव्या डीपीआरमध्येव्यावसायिक क्षेत्र म्हणून मंजुरी देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. बैठकीला सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम, अतिरिक्त आयुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा