शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सु्प्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावरुन भाजप आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. आता याच मुद्द्यावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
भाजपच्या सेवा समन्वय अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पंचायत समिती सदस्य भाऊ ईदाते ,भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अक्षय फाटक, तालुकाध्यक्ष जया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमोद जठार काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टात सुनावणीत उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलं आहे की धनुष्यबाणही शिंदेंकडे जात आहे आणि म्हणूनच त्यांनी ते चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. यावरून लक्षात येतंय त्यांना धनुष्यबाण पेलवले नाही. आता तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हाताखाली तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी पेलवलं. आता ज्याला पेलवलं त्याच्याकडे जाईल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना प्रमोद जठार यांनी सुनावले आहे.
जठार यांची संजय राऊतांवर खोचक टीका
आता उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या हातात काही राहिलेले नाही आणि म्हणूनच ते शिवसेना, भाजपवर टीका करतात. संजय राऊत रोज सकाळी उठल्यावर भैया रोज दुधाचा रतीब घालतो, त्याचप्रमाणे आता कोणतेच विषय राहिले नाही म्हणून मुख्यमंत्री बदलाचा विषयही पुढे आणतात, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांची जठार यांनी खिल्ली उडवली आहे.
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची मांडली भूमिका
कोकणात प्रकल्प यायचे तेव्हा येतील. मात्र आमच्या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात तरुणांना शासनाच्या भरती पदाच्या संवर्गात स्थानिकांनाच न्याय मिळाला हवा. तो त्यांचा हक्क आहे. येथील बेरोजगारांच्या भविष्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून गावेच्या गावे खाली होत आहेत. घर बंद पडत चालली आहेत. त्यामुळे आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका जठार यांनी मांडली.
शिक्षकांसहित सगळ्यात विभागात केवळ कोकणातल्या स्थानिक युवा वर्गालाच न्याय देत 80 टक्के स्थानिक भरतीमध्ये आरक्षण असावं, अशी आमची सरकारकडे प्रमुख मागणी आहे. शासकीय भरतीतील जिल्हा संवर्ग पुनरुज्जीवित करण्यात यावा, या आरक्षणाचा कायदा आणण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणे ही आमची प्रमुख मागणी असल्याचा मुद्दा जठार यांनी मांडला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या आमचे जनतेसाठी या सेवा समन्वय अभियान सुरू आहे. या अंतर्गत आमच्याकडे जनतेतून अनेक निवेदने, प्रश्न आले आहेत. त्याचा पाठपुरावा केला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
कोकणातील भारतरत्न महर्षी कर्वे, भारतरत्न पा. वा. काणे, परमपूज्य साने गुरुजी यांचे दापोली तालुक्यातील मुळगाव असलेले अनुक्रमे मुरुड, खेड तालुक्यातील मुर्डे व साने गुरुजींचे पालगड या त्यांच्या गावांमध्येच क्लस्टर योजनेतून स्मारक आणि विकास करावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितल.
मत्स्यला शेतीचा दर्जा दिला. इतकंच नाही तर सिंधुदुर्गात आता जहाज बांधणीचा मोठा प्रकल्प सुरू होतो आहे. मुंबईत वॉटर टॅक्सी प्रकल्प आणला जातोय. मंत्री नितेश राणे आमचे डायनॅमिक मंत्री आहेत, अशा शब्दात प्रमोद जठार यांनी मंत्री नितेश राणे यांचं कौतुक केलं आहे.
भास्कर जाधव यांना तुम्ही भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. तेच आता सध्या गुहागर विधानसभा मतदारसंघात रामरक्षा आंदोलनातून भाजपवरच टीका करत आहेत. यावर ते म्हणाले, जास्त टीका केली की समजायचं की तो माणूस त्या पक्षाच्या जवळ गेलेला आहे, असे सूचक विधान भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केले.
विधान परिषद निवडणुकीतून ठाकरे गटाकडून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेले रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्यावर भाजप पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ते मोठे नेते आहेत. त्यांचा निर्णय प्रदेश पातळीवरून होईल. हा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी रोखला आहे का? यावर ते म्हणाले की, कोणीही रोखला नाही मात्र तो निर्णय प्रदेश पातळीवर होईल असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा