Trisha Jolly, Gayatri Gopichand, BWF World Championship 2026 : बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप २०२६मध्ये त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी मोठा पराक्रम केला. चीनच्या बलाढ्य जोडीला हरवत भारताचे पदक पक्के केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप २०२६ ( Badminton World Championships 2026 ) च्या मैदानातून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी केवळ आनंदाचीच नाही, तर डोळ्यांच्या कडा ओलावणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला दुहेरी संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात चीनच्या बलाढ्य जोडीला नमवून भारताचे पदक निश्चित केल्यावर ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या युवा जोडीला अक्षरशः अश्रू अनावर झाले.
विजयाचा तो भावुक क्षण
सामन्यातील शेवटचा गुण मिळवताच ट्रीसा आणि गायत्री यांनी कोर्टवरच एकमेकींना घट्ट मिठी मारली. गेली अनेक वर्षे घेतलेली मेहनत आणि १५ वर्षांचा भारताचा पदकांचा वनवास संपवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघींच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. चीनच्या घरच्या मैदानावर, हजारो चिनी प्रेक्षकांच्या गर्दीत भारताचा झेंडा दिमाखात फडकताना पाहून या दोन्ही २३ वर्षीय खेळाडू कमालीच्या भावुक झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले.
कोणत्याही मानांकनाविना (Unseeded) मैदानात उतरलेल्या ट्रीसा आणि गायत्री या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जिया यीफान आणि झांग शू शियान यांच्यावर १६-२१, २१-१५, २१-१३ असा रोमहर्षक विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतरही भारतीय तरुणींनी कोणतीही हार न मानता शानदार ‘स्मॅश’ आणि अचूक ‘नेट प्ले’च्या जोरावर जबरदस्त पलटवार केला. तब्बल ६९ मिनिटे चाललेल्या या थरारक सामन्यात भारतीय जोडीने आपला दबदबा सिद्ध केला. विश्वचॅम्पियनशिपच्या नियमांनुसार, उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही जोड्यांना किमान कांस्यपदक दिले जाते, त्यामुळे ट्रीसा आणि गायत्री यांचे पदक आता पक्के झाले आहे.
१५ वर्षांचा वनवास अखेर संपला
भारतीय जोडी इतकी भावुक होण्यामागे एक मोठे कारण होते, ते म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपच्या महिला दुहेरीत भारताच्या खात्यात पदकाची नोंद होत आहे. याआधी २०११ मध्ये लंडन येथे झालेल्या विश्वचॅम्पियनशिपमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता गायत्री आणि ट्रीसाने हा दुष्काळ संपवला आहे. गायत्री ही भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या असून, तिने आपल्या वडिलांचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेला आहे.
ही लढत सोपी नव्हती. भारतीय जोडीने ज्या चिनी जोडीला हरवून हा भावुक विजय मिळवला, त्यातील जिया यीफान ही महिला दुहेरीतील एक दिग्गज खेळाडू आहे. तिने याआधी तब्बल ४ वेळा विश्वचॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले असून, तिच्या नावावर ऑलिम्पिकचे सुवर्ण आणि रौप्यपदकही आहे. निवृत्त झालेली तिची जुनी साथीदार चेन किंगचेन हिच्याऐवजी जियाने झांग शू शियानसोबत नवी जोडी बनवली होती. मात्र, या नव्या चिनी जोडीला भारतीय तरुणींनी त्यांच्याच देशात धूळ चारली आणि भारताच्या क्रीडा इतिहासात एका सुवर्णपानाची भर घातली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा