Headlines

Washim Malegaon Taluka Farmer Dies after Swimming in Farm Well Latest Marathi News; काम झाल्यावर पोहायला विहिरीत उतरले, पुन्हा वर आलेच नाही; घरचा कर्ता पुरुष गेल्यानं आई-बापाचा हंबरडा


Washim Farmer Dies after Swimming in Well : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम केल्यानंतर विहिरीत पोहायला गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

Washim Malegaon Taluka Farmer Dies after Swimming in Farm Well (1)
वाशिम विहिरीत पोहायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना मालेगाव तालुक्यातील सुकांडा गावात घडली. रमेश आंधळे असं मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव आहे. रमेश आंधळे यांनी दिवसभर शेतात काम केल्यानंतर ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. विहिरीत पोहल्यानंतर वर चढताना तोल जाऊन विहिरीत मोटार पंपासाठी बसवलेल्या लोखंडी चॅनलवर पडून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लोखंडी चॅनलवर पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले आणि पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी चर्चा गावात सुरू आहे.

रमेश आंधळे बराच वेळ झाल्यानंतरही ते विहिरीतून बाहेर न आल्यानं शेतातील इतर मजुरांनी विहिरीत पाहिले असता रमेश आंधळे यांचा मृतदेह दिसला. विहिरीत पाणी जास्त असल्याने सामान्य नागरिकांना त्यांचा मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करून ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Maharashtra TimesCrime News: तू खूप क्यूट आहेस, घरी सांग उशिरा येते, फिरायला जाऊ; चौथीतील मुलीला स्कूल बसमध्ये अश्लील स्पर्श, 30 वर्षीय चालकावर गुन्हा
मृतक रमेश आंधळे यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसऱ्यांच्या शेतात ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार गमावला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला होता. शहरातील दारव्हा येथे भीषण अपघात झाला होता. भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दारव्हा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळ ही घटना घडली होती.

Maharashtra Timesचार तासांचा प्रवास फक्त सव्वा तासांत; समृद्धी महामार्ग-वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी

महाराष्ट्र डेस्क

लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.आणखी वाचा