Wardha Tanker Car Accident kills Police Family Prashant Vaidya Wife Son Daughter dies while returning from village; चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, टँकर कार अपघातात चौघंही ठार, गावाच्या डोळ्याची धार थांबेना
Wardha Tanker Car Accident kills Police Family Prashant Vaidya Wife Son Daughter dies while returning from village; चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, टँकर कार अपघातात चौघंही ठार, गावाच्या डोळ्याची धार थांबेना
Wardha Police Family Accident Death : रामनवमीच्या उत्सवात सहभागी झालेले वैद्य कुटुंब आनंदात घराकडे परत निघाले होते. परत निघताना संपूर्ण कुटुंबाला काहीच दिवसांत परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते
वैद्य कुटुंबाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वर्धा : वर्धा-समुद्रपूर मार्गावरून जात असताना अचानक रानडुक्कर आडवे आल्याने कार टँकरवर धडकली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास तरोडा शिवारात ही घटना घडली.
समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील प्रशांत वैद्य हे पोलिस कर्मचारी म्हणून वडनेरच्या ठाण्यात कार्यरत होते. रामनवमी असल्याने कुटुंबासह मांडगावला आले होते. सोमवारी रात्री गावावरून कारने परत वर्ध्याला निघाले. तरोडा गावाजवळील साखरा फाट्यावर अचानक कारसमोर रानडुक्कर आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
कार समोरून येणाऱ्या डिझेलच्या टँकरवर धडकली. या अपघातात प्रशांत यांच्यासह पत्नी प्रियंका, मुलगा प्रियांश, मुलगी मनस्वी असे चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही वेळातच प्रियंका आणि प्रियांश यांचा मृत्यू झाला. प्रशांत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मनस्वीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले गेले गेले. पण, उपचारादरम्यान बापलेकीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार ठाकूर करीत आहेत.
रामदास जलपत धुर्वे (५०) रा. सायखेडा असे मृताचे नाव आहे. तर तृप्ती रामदास धुर्वे (२४) व वैष्णवी विलास पेंदोर (२३) रा. कारेगाव (झरी) असे भाचीचे नाव आहे. रामदास हे सायखेडा येथे राहत होते. घरी काही कार्यक्रम असल्याने त्यांच्या बहिणीची मुलगी वैष्णवी पाहुणी म्हणून आली होती.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा