Headlines

Vishal Aditya Singh : 7 वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्यानं सोडलं मौन; काय म्हणाला?


Vishal Aditya Singh On Shweta Tiwari : अभिनेता विषय आदित्य सिंग आणि श्वेता तिवारी यांच्या अफेअरच्या चर्चा काही महिन्यांपासून होत आहेत. अशातच आता अभिनेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Aditya Singh On Shweta Tiwari
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेता विशाल आदित्य सिंग अलीकडेच ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसला होता. मात्र, आता त्यानं हा शो सोडला आहे. विशाल अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचं नाव अनेकदा त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत जोडलं गेलंय. अशातच आता विशालनं या चर्चांवर मौन सोडलंय.

विशाल आदित्य सिंग काय म्हणाला?

विशाल आदित्य सिंगनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानं श्वेता तिवारीसोबतच्या अफेअरच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. श्वेता तिवारीसोबत रिलेशनशिपच्या अफवांबाबत विशाल म्हणाला, ‘हे सोशल मीडिया आहे. इथे कोणीही काहीही बोलू शकतं. यामुळे, ज्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही असे लोकही बोलत आहेत.’

Maharashtra TimesSavita Malpekar : ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते’, सविता मालपेकरांनी सांगितला ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग
टेलीचक्करशी बोलताना, विशाल आदित्य सिंगनं श्वेतासोबतच्या अफेअर आणि लग्नाच्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आणि ट्रोलर्सवर टीका केली. अभिनेता म्हणाला की, जर कोणी पुढे येऊन या सगळ्याबद्दल बोललं, तर तो त्यांची चांगलीच खरडपट्टी करेन. विशाल म्हणाला, ‘जर कोणी म्हणालं की, मी गोरेगाव फर्स्ट डेपोसमोर उभा आहे, तर मी त्यांना तिथेच थांबायला सांगेन. मी तिथे येईन आणि मग मजा येईल.’

बॉलिवूड स्टार्ससोबत पहिली भेट अन् वर्षा उसगांवकर यांच्यासोबत असं काय घडलं ?

विशालनं सांगितलं की, श्वेता तिवारी त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. अभिनेत्रीला ‘आई’ म्हणायलाही त्याची काहीच हरकत नाही. विशाल म्हणाला, ‘श्वेता तिवारी माझी इतकी चांगली मैत्रीण आहे की, तिला तिवारीजी म्हणायला मला काहीच अडचण वाटत नाही. आमची मैत्री इतकी घट्ट आहे की, तिला ‘आई’ म्हणायला मला काही वाटत नाही.’ अभिनेता पुढे म्हणाला की, हत्ती चालत राहतो आणि कुत्रे भुंकत राहतात. लोकांना काहीही म्हणूदे, पण त्याचा आमच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही.

Maharashtra TimesZee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री दोन मुलांची आई आहे. तिची मुलगी, पलक तिवारीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. श्वेता तिवारीची दोन लग्न झाली असून तिचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत झालेलं. त्यानंतर श्वेतानं अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. मात्र, त्यांच्याही घटस्फोट झाला.

श्वेता तिवारीबद्दल काय म्हणालेला राजा चौधरी?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये श्वेताचा एक्स पती राजा चौधरीनं श्वेतावर आरोप केले होते. लग्न झाल्यानंतर श्वेताचं अभिनेता सीझेनसोबत अफेअर असल्याचं राजा चौधरी म्हणाला. राजा चौधरीनं सांगितलं की, ‘मी श्वेता आणि सीझेनला रंगेहाथ पकडलेलं. श्वेताने मला सांगितलं, ती शुटिंगला जातेय. तिच्या गाडीत माझं सामान होतं, ते मला घ्यायचं होतं, म्हणून मी सेटवर गेलो. पण, ती तिथे नव्हती. एक तासानं श्वेता सीझेनच्या गाडीतून आली आणि त्या गाडीच्या मागून तिचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती मला म्हणाली, ‘मी डबिंगला आहे’ मी तिथे गेलो. पण तिथे कळलं आज डबिंग नाही. श्वेता सीझेनसोबत होती. असं अनेकदा झालंय, तरीही ती कबूल करत नव्हती, ती कायमच खोटं बोलत आली आहे. श्वेता खूप खोटारडी आहे.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा