Headlines

Uddhav Thackeray,राहुल गांधींच्या सभेला जाणार का? उद्धव ठाकरेंची देहबोलीच उत्तर देऊन गेली – maharashtra political news shivsena uddhav thackeray not to attend congress rahul gandhi bharat jodo yatra rally in shegaon buldhana


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) उद्या बुलढाण्यात पोहोचत आहे. यावेळी शेगांवमध्ये राहुल गांधी जनतेला संबोधित करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) या सभेला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र ठाकरेंनी या सभेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. कारण राहुल गांधींच्या सभेला हजर राहणार नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अखेरीस ठाकरे उठून जात असताना, यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, की आपण शेगावच्या सभेला उपस्थित राहणार की नाही? या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं, मात्र त्यांची देहबोली आणि हातवाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे सभेला हजर राहणार नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधूनच समजलं.

खरं तर राहुल गांधी यांनीच फोन करुन उद्धव ठाकरेंना सभेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिल्याचं बोललं जातं. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी त्यांना प्रवास, दौरे टाळण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीची एकी दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र ठाकरेंसोबत शरद पवारांच्या उपस्थितीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. तर नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले संजय राऊतही प्रकृतीच्या कारणास्तव सभेत हजर राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावत शिवसेना-काँग्रेस एकीची मशाल धगधगत ठेवली आहे.

दरम्यान, आम्हाला सावरकरांबद्दल अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कुणी कितीही पुसू म्हटली तरी ती पुसणार नाही. पण स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. आम्ही तर तेव्हा नव्हतोच. पण ज्या रा स्व संघाला आता एक दोन वर्षामध्ये १०० वर्ष होणार आहेत, ते स्वातंत्र्यलढ्यात कुठे होते? असा परखड सवाल करत उद्धव ठाकरे भाजप आणि RSS वर तुटून पडले.

हेही वाचा : काल म्हणाले, ‘सावरकर माफीवीर’, आज थेट माफीनाफ्याचा कागदच दाखवला, राहुल गांधी आक्रमक पवित्र्यात!

राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदर आहेच. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला याचा मला आनंद आहे. पण ज्यांचा स्वातंत्र्याशी काडीचा संबंध नाही त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल बोलूच नये. तुम्ही काय केलंत?, पाकिस्तानातील किती जमीन तुम्ही राज्यात आणली? तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेसाठी काय केलंत? लोकांना उगाच संभ्रमित करु नका, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारले.:

हेही वाचा : राणेंनी स्वत:च्याच बंगल्यावर मारला हातोडा, पाहा बंगल्यातील कोणकोणते बांधकाम अनधिकृत

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत