Headlines

Two youths die on the spot in truck and bike accident on chhatrapati sambhajinagar pune road traffic disrupted; पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू


Chhatrapati Sambhajinagar News: अपघाताचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये दोष कुणाचा, याबाबत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

accident news
पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर गंगापूरजवळ एका भीषण आणि अत्यंत दुःखद अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. समोर धावणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरात धडक दिल्याने हा थरकाप उडवणारा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रितेश राजेश राठोड (वय २३),अविनाश केशव चव्हाण (वय २४, रा. मंठा जि. जालना) असे मयत झालेल्या तरुणांचं नाव आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण हे दोघे दुचाकीवरून मंठा जि. जालना तालुक्यातून पुण्याकडे निघाले होते. ते दुचाकीने जालन्याहून पुण्याला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर पोहोचताच, महामार्गावरून समोर धावणाऱ्या एका आयशर ट्रकला त्यांच्या भरधाव दुचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागेवरच कोसळले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर येथील रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळ गाठले आणि दोन्ही जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉ. विजय केंद्रे यांनी तपासाअंती दोघांनाही मृत घोषित केले.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत; प्रत्यक्षदर्शींचे धक्कादायक दावे

अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघाताचा सविस्तर पंचनामा केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांची दुचाकी अत्यंत भरधाव वेगात होती आणि ती थेट आयशर ट्रकला पाठीमागून आदळली.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा