पण जर विमाधारक आणि नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू झाला तर…
बऱ्याचदा अशा अनेक दुर्घटना घडून येतात ज्यात विमाधारक आणि नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू होता. अशावेळी या विमा पॉलिसीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम कुणाला जाते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण ज्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे दिले जाणार आहेत तो विमाधारक तर मृत आहेच, पण या विमाधारकाच्या मृत्यूनंतर ज्या वारसाला पैसे मिळणार आहेत तो नॉमिनीदेखील मृत आहे.
मग आता विम्याचे पैसे कुणाला मिळणार?
जर विमाधारक आणि नॉमिनी दोघांचा एकाचवेळी मृत्यू झाला तर विम्याची रक्कम कायदेशीर वारसाला मिळते. भारताच्या हिंदू सक्सेशन अॅक्टनुसार आई-वडिलांच्या वारसा हक्कांवर त्यांच्या मुलांचा हक्क आहे. तर मुलाच्या वारसा हक्कांवर त्याच्या मुलांचा किंवा आई-वडिलांचा हक्क असतो. त्यामुळे विमाधारकाने निश्चित केलेला नॉमिनीही हयात नसेल तर विम्याच्या रक्कमेवर विमाधारकाच्या कायदेशीर वारसाचा असतो. पण बहुतेकवेळी कायदेशीर वारसालादेखील न्यायायलायला तो विमाधारकाचा कायदेशीर वारस असल्याचे प्रमाण द्यावे लागते. त्यासाठी त्याला सक्सेशन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्याचबरोबर विमाधारक तसेच नॉमिनीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, एफआयआर, पोस्टमॉर्टम रिपोर्टही न्यायालयासमोर तसेच विमा कंपनीसमोर सादर करावे लागते.
अल्पवयीन वारसाला थेट रक्कम मिळत नाही!
जर कायदेशीर वारस वयाचे 18 वर्षे पूर्ण नसेल तर त्याला विम्या रक्कमेवर थेट हक्क मिळवता येत नाही. त्या रक्कमेच्या देखभालीकरिता एका व्यक्तीची निवड केली जाते. वारस 18 वर्षे पूर्ण झाला की विम्याच्या रक्कमेवर वारसाचा पूर्ण हक्क आणि आधिकार येतो. देखभालीकरिता नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या रक्कमेवर हक्क गाजवण्याची परवानगी नाही. या व्यक्तीची निवड एक तर विमाधारकाने आधीच करून ठेवलेली असते अन्यथा विमाधारक किंवा नॉमिनीच्या मृत्यूनंतर न्यायलय ठरवतं. हा व्यक्ति साधारणतः कायदेशीर वारसाचा मामा/काका/ मावशी किंवा इतर नातेवाईकांपैकी कुणीतरी असतं.
China Tariff-Evasion Network: भारताच्या ‘मित्राने’ आधी 100% टॅरिफ लादला आता चौकशी करणार! चीनच्या मदतीने अमेरिकन टॅरिफ बुडवल्याचा आरोपप्रत्येक विमाधारकाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट!
विमाधारक टर्म इन्शुरन्सची निवड का करतात? भविष्यात स्वतःची मृत्यू झाली तर कुटुंबाला आर्थिक बळ मिळावे म्हणून. पण अशावेळी परिस्थिति कोणती उद्भवू शकते? याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे एकापेक्षा अनेक नॉमिनी असणे अनेकदा फायद्याचे ठरते. उदाहरणार्थ, पतीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि पत्नीची नॉमिनी म्हणून निवड केली अशावेळी मुलांची पर्याय नॉमिनी म्हणून निवड करणे उत्तम ठरते, जेणेकरून भविष्यात मुलांना कायदेशीर वारस म्हणून सिद्ध करण्यासाठी होणारा त्रास कमी होऊ शकतो आणि रक्कम थेट मुलांना मिळू शकते.

