Headlines

Term Insurance Money Claim Rules ; विमाधारक, नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू झाला तर विम्याचे पैसे कुणाला मिळतात? टर्म इन्शुरन्सचे नियम सोप्या भाषेत समजून घ्या


अनेकदा कुटुंबाच्या कर्त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी कुटुंबाचा कर्ता आधीच व्यवस्था करून ठेवतो. बहुतेक कुटुंबप्रमुख टर्म इन्शुरन्ससारखे पर्याय निवडतात. जीवन विमा मिळवल्यानंतर समजा काहीच वर्षात विमाधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीच्या नियमांनुसार विमाधारकाच्या कुटुंबाला ठरवण्यात आलेली रक्कम आर्थिक आधार म्हणून मिळते. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे विमाधारकाला नॉमिनीचे नाव जीवन विमा निवडताना इन्शुरन्सकंपनीकडे जमा करावे लागते. नॉमिनी म्हणजे विमाधारकाच्या या योजनेचा वारसदार. विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमाधारकाने निवड केलेल्या वारसदाराला या पॉलिसीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम मिळते.

पण जर विमाधारक आणि नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू झाला तर…

बऱ्याचदा अशा अनेक दुर्घटना घडून येतात ज्यात विमाधारक आणि नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू होता. अशावेळी या विमा पॉलिसीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम कुणाला जाते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण ज्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे दिले जाणार आहेत तो विमाधारक तर मृत आहेच, पण या विमाधारकाच्या मृत्यूनंतर ज्या वारसाला पैसे मिळणार आहेत तो नॉमिनीदेखील मृत आहे.

मग आता विम्याचे पैसे कुणाला मिळणार?

जर विमाधारक आणि नॉमिनी दोघांचा एकाचवेळी मृत्यू झाला तर विम्याची रक्कम कायदेशीर वारसाला मिळते. भारताच्या हिंदू सक्सेशन अॅक्टनुसार आई-वडिलांच्या वारसा हक्कांवर त्यांच्या मुलांचा हक्क आहे. तर मुलाच्या वारसा हक्कांवर त्याच्या मुलांचा किंवा आई-वडिलांचा हक्क असतो. त्यामुळे विमाधारकाने निश्चित केलेला नॉमिनीही हयात नसेल तर विम्याच्या रक्कमेवर विमाधारकाच्या कायदेशीर वारसाचा असतो. पण बहुतेकवेळी कायदेशीर वारसालादेखील न्यायायलायला तो विमाधारकाचा कायदेशीर वारस असल्याचे प्रमाण द्यावे लागते. त्यासाठी त्याला सक्सेशन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्याचबरोबर विमाधारक तसेच नॉमिनीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, एफआयआर, पोस्टमॉर्टम रिपोर्टही न्यायालयासमोर तसेच विमा कंपनीसमोर सादर करावे लागते.

अल्पवयीन वारसाला थेट रक्कम मिळत नाही!

जर कायदेशीर वारस वयाचे 18 वर्षे पूर्ण नसेल तर त्याला विम्या रक्कमेवर थेट हक्क मिळवता येत नाही. त्या रक्कमेच्या देखभालीकरिता एका व्यक्तीची निवड केली जाते. वारस 18 वर्षे पूर्ण झाला की विम्याच्या रक्कमेवर वारसाचा पूर्ण हक्क आणि आधिकार येतो. देखभालीकरिता नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या रक्कमेवर हक्क गाजवण्याची परवानगी नाही. या व्यक्तीची निवड एक तर विमाधारकाने आधीच करून ठेवलेली असते अन्यथा विमाधारक किंवा नॉमिनीच्या मृत्यूनंतर न्यायलय ठरवतं. हा व्यक्ति साधारणतः कायदेशीर वारसाचा मामा/काका/ मावशी किंवा इतर नातेवाईकांपैकी कुणीतरी असतं.

Maharashtra TimesChina Tariff-Evasion Network: भारताच्या ‘मित्राने’ आधी 100% टॅरिफ लादला आता चौकशी करणार! चीनच्या मदतीने अमेरिकन टॅरिफ बुडवल्याचा आरोपप्रत्येक विमाधारकाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट!

विमाधारक टर्म इन्शुरन्सची निवड का करतात? भविष्यात स्वतःची मृत्यू झाली तर कुटुंबाला आर्थिक बळ मिळावे म्हणून. पण अशावेळी परिस्थिति कोणती उद्भवू शकते? याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे एकापेक्षा अनेक नॉमिनी असणे अनेकदा फायद्याचे ठरते. उदाहरणार्थ, पतीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि पत्नीची नॉमिनी म्हणून निवड केली अशावेळी मुलांची पर्याय नॉमिनी म्हणून निवड करणे उत्तम ठरते, जेणेकरून भविष्यात मुलांना कायदेशीर वारस म्हणून सिद्ध करण्यासाठी होणारा त्रास कमी होऊ शकतो आणि रक्कम थेट मुलांना मिळू शकते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत