पुणे : राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला असतानाच आता मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 4 मराठा लोकप्रतिनिधींचे दाखले जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहेत. प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानं कुणबी नोंदीवरून वातावरण चागलंच तापलं आहे. यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरलं असून मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना पुन्हा एकदा जरांगे यांनी बोलून दाखवली आहे.
मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या वादत उडी घेतली असून त्यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की मराठा आरक्षणाचे नेमकं झालं काय? खरंच एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण खरं होत का?’ असं म्हणत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षण देण्यासंदर्भातील हेतूवरच शंका उपस्थित केली आहे.
सुषमा अंधारे एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत म्हणाल्या की, “7-8 महिन्यांपूर्वी सुद्धा आझाद मैदानातील आंदोलनंतर मी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली होती. मुळात एकनाथ शिंदे यांना स्वतःला ‘मराठा मॅन’ म्हणून प्रस्थापित करण्याची घाई अन् त्यातून उतावीळ घेतले गेलेले निर्णय, तसंच शिंदे-फडणवीसांमधील असलेले कोल्ड वॉर जे आता अतिशय टोकाला पोहचलेले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस हे शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकनाथ शिंदे काही भूमिका घेणार असतील तर त्यांना ती घेऊ देतील ते फडणवीस कसले?’ असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदे यांनी मराठा समाजाला पोकळ शब्द दिलाच का? दोघांचं राजकारण होतंय आणि जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रथमच टीका करत शिंदे यांनी दुहेरी खेळ करत फसवणूक केली असल्याच म्हटलं आहे. त्यात आता ठाकरेंच्या पक्षाकडून देखील एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांची अडचण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत आगामी काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा