Headlines

Sooraj Pancholi : ‘मी २० वर्षांचा होतो, या खटल्याच्या ओझ्याखाली जगलो’ जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका, अभिनेता भावूक


Sooraj Pancholi Post : जिया खान मृत्यू प्रकरणातून सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका झाली. त्याबद्दल अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली आहे.

Sooraj Pancholi On Jiah Khan Case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानं या खटल्यासाठी १४ वर्षे संघर्ष केला. विशेष सीबीआय न्यायालयात हा खटला १४ वर्षे चालला आणि त्याची निर्दोष मुक्तता झाली. निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही अभिनेत्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या अभिनेत्यानं या प्रकरणी मौन सोडलं असून, ‘माझी निर्दोषता सिद्ध करण्यासाठी १४ वर्षे लागली.’ असं सूरजनं म्हटलंय.

सूरज पांचोलीची पोस्ट

सूरज पांचोलीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मी सर्व माध्यमांना विनंती करतो. तुमच्या मते कोणता प्रश्न अनुत्तरित राहिला आहे, ते मला सांगा. मी १४ वर्षे या न्यायालयीन खटल्याचा सामना केला आहे. या खटल्याचा निर्णय तथ्य, पुरावे आणि कायद्याच्या आधारावर झाला. माझी निर्दोष मुक्तता झाली आहे आणि कायदेशीर प्रक्रियेत कोणताही प्रश्न अनुत्तरित राहिलेला नाही. न्यायालयाची सर्व कागदपत्रे आणि खटल्याची कार्यवाही सर्वांसाठी उपलब्ध आहे, आणि एखादं मत बनवण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या.’

सूरजचं करिअर घडवण्यासाठी आदित्य पांचोलीचे प्रयत्न

‘ही घटना घडली तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. मी तिला जेमतेम चार महिनेच ओळखत होतो आणि ती कोणत्या परिस्थितीतून जात होती याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी, एखादी व्यक्ती स्वतःच्या मनात किती दुःख दडवून ठेवू शकते हे समजण्याइतका मी लहान होतो. पुढे जे घडलं, त्यानं माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं.’
Maharashtra TimesDivya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग

माझी निर्दोषता सिद्ध करायला १४ वर्षे लागली…

सूरज पांचोली पुढे म्हणाला, ‘माझी निर्दोषता सिद्ध करायला मला १४ वर्षे लागली. ही ती वर्षे होती जेव्हा मी माझं आयुष्य घडवत होतो. असं असूनही, मी या खटल्याच्या ओझ्याखाली जगत राहिलो. दररोज माझ्या मनात आणि हृदयात काय चाललं होतं, हे फक्त मलाच माहीत आहे. न्यायालय हे एकमेव ठिकाण होतं जिथे मी माझी निर्दोषता सिद्ध करू शकलो असतो. मी न्यायिक प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि १४ वर्षांनंतर, या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली. यानंतरही जर लोक मला दोषी मानत असतील आणि माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, तर खरं सांगायचं तर, मी आणखी काय करू शकतो हे मला माहीत नाही.’

‘मी शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण शांत राहण्याचा अर्थ असा नाही की मी कोणालाही माझ्याबद्दल काहीही लिहिण्याचा अधिकार दिला आहे. तिनं जे काही वैयक्तिक अनुभव आणि दुःख मला सांगितली, त्याबद्दल मी कधीही जाहीरपणे बोललो नाही. सर्व अडचणी असूनही, मी तिच्या प्रायव्हसीचा आदर केला. बदल्यात मला फक्त तोच आदर आणि न्याय हवा आहे.’ असं सूरजनं शेवटी म्हटलंय.
Maharashtra TimesMilind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य

काय घडलेलं नेमकं?

दरम्यान, २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खाननं आत्महत्या केली. त्यावेळी एक सुसाईड नोट सापडली होती. अभिनेत्रीच्या आईनं सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले. यानंतर सूरज पांचोलीला अटकही झाली. काही काळानंतर त्याची जामिनावर सुटका झाली, पण हे प्रकरण अनेक वर्षे चाललं. या काळात त्याला कोणतंही काम मिळालं नाही. दरम्यान, सूरजने त्याच्यावरील आरोप सातत्यानं नाकारले. दहा वर्षांनंतर, एप्रिल २०२३ मध्ये न्यायालयाचा निकाल सूरज पांचोलीच्या बाजूने लागला आणि त्याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा