महाराष्ट्रातलं एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात सुरु झालेल्या यात्रेमुळे हे गाव सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे गाव म्हणजे सारंगखेडा.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत देशभरातून मोठ्या प्रमाणावर घोडे दाखल झाले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून सुमारे 20 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. सारंखेडा येथील घोडेबाजार सध्या तेजीत असून आतापर्यंत 315 घोड्यांच्या विक्रीतून सुमारे 1 कोटी 53 लाख 99 हजार 600 रुपयांची उलाढाल झाली आहे. या यात्रेतील वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. विविध अश्व स्पर्धा रंगतदार होत आहेत. अश्वांची डौलदार चाल पाहून डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या घोड्यांच्या रेवाल चाल शर्यतीत परभणीचा अल्स्कब प्रथम तर प्रिथमपूरचा (मध्य प्रदेश) गुलसफर या अश्वांनी द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत विविध प्रांतातून आलेले देखणे आणि सुंदर अशा 36 अश्वांनी सहभाग नोंदविला होता.
सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील श्री. दत्त भगवान यात्रेस 4 डिसेंबर पासून सुरुवात झाली. महानुभाव पंथीयांचे हे श्रद्धा स्थान असलेल्या या ठिकाणी श्री. दत्तांचे एकमुखी मूर्ती आहे. भारतात पुष्कर येथे देशातील सर्वात मोठा अश्व बाजार भरतो. त्यानंतर दोन नंबरवर सारंगखेडा येथे बाजार भरत असतो. देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात यासह विविध राज्यातून विविध जातीचे सुमारे 2800 च्या वर घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
सध्या घोडे बाजार तेजीत असून मंगळवारी 40 तर सोमवारी 78 घोड्यांची विक्री झाली. घोड्यांच्या विक्रीतून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 53 लाख 99 हजार 600 रुपयांची उलाढाल झाली आहे. सारंगखेडा यात्रेला परिसरातील जीवनदायी यात्रा म्हटले जाते. या यात्रेच्या माध्यमातून जवळपास 20 हजार नागरिकांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो.
अश्वस्पर्धांना झाली सुरुवात
सारंगखेडा (ता.शहादा) येथे दत्त जयंतीपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रोत्सव सुरु आहे. येथील अश्व बाजार देशभर प्रसिद्ध आहे. अश्व बाजाराला बदलत्या परिस्थितीनुसार नवा आयाम मिळावा यासाठी जयपालसिंह रावल यांनी चेतक फेस्टिवल सुरु केला आहे. या चेतक फेस्टिवलमध्ये (ता.९) मंगळवार पासून अश्वांच्या विविध स्पर्धांना थाटात शुभारंभ झाला . त्यात प्रथम मंगळवारी अश्वांच्या रेवाल चाल स्पर्धांनी प्रारंभ झाला. इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर प्रहार, श्रीकांत शिंदे यांचं लोकसभेत मतचोरीवर आक्रमक भाषण दुपारी दोन वाजता रेवाल चाल स्पर्धा झाल्या. यात ३६ अश्वांचा सहभाग घेतला. नवाब , रुद्रा , अल्स्कब , नटराज , गुलसफर, शेरा, बादशाह, पवन, टायगर, बादल या अश्वांमध्ये अंतिम स्पर्धा झाली. स्पर्धेत परभणी येथील अल्स्कब या अश्वाने प्रथम क्रमांक मिळून बाजी मारली. तर द्वितीय पुरणपूर येथील गुलसफर या अश्वांला गौरविण्यात आले. तर तृतीय बरेली (उत्तर प्रदेश) येथील आसिफ भाई यांचा पवन या अश्वांला गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून रुद्रा या अश्वाला गौरविण्यात आले. ‘हे विधिमंडळ माझ्या खिशात आहे’, अधिकाऱ्याच्या वल्गना, अनिल परब यांचा सभागृहात गंभीर आरोप चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते अश्वाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेडी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल उपस्थित होते. अश्व रेवाल चाल स्पर्धा म्हणजे घोड्यांच्या वेगाची आणि कौशल्याची एक शर्यत आहे, जिथे घोडे विशिष्ट चालीमध्ये (रेवाल चाल) धावतात. यावेळी चेतक फेस्टिवल मार्फत तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर धावणारे घोडे पाहून हजारो प्रेक्षकांनी आपल्या चक्षुनी डोळ्याचे पारणे फेडले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा