Headlines

Ramdas Tadas : धक्कादायक! रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, कारण… – ramdas tadas denied entry to ram mandir sanctum by priests in wardha


Ramdas Tadas News : माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Ramdas Tadas
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वर्धा : देशभरात आज राम नवमीचा उत्साह असताना वर्धातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुनच रामदास तडस यांचे कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती रामदास तडस यांनी दिली आहे. संबंधित घटना ही वर्धाच्या देवळी येथील राम मंदिरात घडली आहे. रामदास तडस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

“मी दरवर्षी राम नवमीच्या दिवशी दर्शनाला जातो. मी 40 वर्षांपासून अशाप्रकारे राम नवमीच्या दिवशी राम मंदिरात दर्शनासाठी जातो. मी राम मंदिराच्या गर्भगृहात जावून रामलल्लांची पूजा करतो. यावेळी माझी पत्नी, कार्यकर्ते सोबत असतात. राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी दिवसभराच्या कार्यक्रमाला जात असतो. पण यावर्षी आम्ही राम मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याने अडवलं. संबंधित पुजारी हाच मंदिराचा ट्रस्टी आहे. तो पुण्याला राहतो. फक्त राम नवनीच्या दिवशी तिथे येतो”, असं रामदास तडस यांनी सांगितलं.
Maharashtra TimesGirish Mahajan : महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप, खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
“संबंधित पुजाऱ्यांनी मला राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी जाण्यास मनाई केली. तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही दुरूनच दर्शन घ्या. मी म्हटलं, मी 40 वर्षांपासून दर्शनाला येतोय. हे काही तुमचं बरोबर नाही. आम्हाला रामलल्लांची आस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करुन दिली आणि तुम्ही मला दर्शन घेण्यापासून रोखत आहात”, असंही रामदास तडस यांनी सांगितलं.

“तुम्ही सोवळं घातलं नाही त्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाहीत, असं पुजारी म्हणाले. यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. कार्यकर्ते आणि पुजाऱ्यामध्ये संघर्ष होण्याची वेळ आली. पण मी विचार केला, आज राम नवमीचा दिवस आहे. आपल्यासाठी संघर्ष बरोबर नाही. संघर्ष करु नका, अशी कार्यकर्त्यांना समज दिली. आमच्या आमदारांनी देखील समज दिली”, अशी माहिती रामदास तडस यांनी दिली.
Maharashtra TimesManikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे मागितली माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
“आमदारांनी त्या देवस्थानचं ऑडीट काढण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे त्या देवस्थानची 200 एकर जमीन असूनसुद्धा वर्गणी करुन सर्व कार्यक्रम करतो. त्यांची मक्तेदारी तिथे आहे. ते अशाप्रकारे लोकांचा अवमान करतात. त्यांची अशाप्रकारची वागणूक बरोबर नाही. माझ्यासोबत पुजारी वागले ते पाहून मी आश्चर्यचकीत झालोय. जनतेने या प्रकरणी तक्रार केली आहे”, असंही रामदास तडस यांनी सांगितलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा